शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारे यांना यंदाचा ‘शाहू पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:37 IST

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेगळी उंची लाभलेला मानाचा शाहू पुरस्कार यंदा माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बुधवारी येथे जाहीर झाला.

ठळक मुद्देअण्णा हजारे यांना यंदाचा ‘शाहू पुरस्कार’जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा : कोल्हापुरात २६ जूनला वितरण

कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेगळी उंची लाभलेला मानाचा शाहू पुरस्कार यंदा माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बुधवारी येथे जाहीर झाला.

ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि विश्वस्त व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २६ जूनला शाहू जयंतीदिनी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारकमध्ये होणाºया शानदार समारंभात या पुरस्काराचे वितरण होईल.किसन बाबूराव हजारे (जन्म १५ जून १९३७ मूळ गाव- भिंगार, जि. अहमदनगर) असे नाव असले तरी ते देशाला अण्णा हजारे या नावानेच परिचित आहेत. मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे अण्णा हजारे हे भारतातील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांना समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने १९९० साली ‘पद्मश्री’ आणि १९९२ साली ‘पद्मभूषण’ पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी लोकसहभागातून राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला.

स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली. अण्णांनी पाठपुरावा केला म्हणूनच माहिती अधिकार कायदा लागू झाला. त्याशिवायही त्यांच्या आंदोलनामुळे एकूण सहा कायदे झाले आहेत. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे.

अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. लष्करातील निवृत्त जवान ते लोकपालाच्या कायद्यासाठी देशातील राजकीय व्यवस्थेला हादरे देणारा लढवय्या अशीच अण्णा हजारे यांची जगभरातील ओळख आहे. त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी या गावाला विकासाचे मॉडेल बनविले व त्यातूनच ते महाराष्ट्राला परिचित झाले.आतापर्यंतचे पुरस्कार विजेते...समाजाला प्रगतीच्या दिशेने दोन पावले पुढे घेऊन जाणाऱ्या ध्येयवादी नेतृत्वास प्रतिवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा पुरस्कारचे चौतिसावे वर्ष आहे. ट्रस्टतर्फे १९८४ ला पहिला पुरस्कार पुरोगामी कृतिशील विचारवंत भाई माधवराव बागल यांना देण्यात आला होता.त्यानंतर मेहरुनिसा दलवाई, मेघनाथ नागेशकर, कवी कुसुमाग्रज, गायिका आशा भोसले, जलतज्ञ राजेंद्र सिंह, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, रयत शिक्षण संस्था, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, माजी सरन्यायाधीश पी. बी. सावंत, ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, आदी मान्यवरांचा या पुरस्काराने आतापर्यंत सन्मान केला आहे.

राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने जाहीर झालेला पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे. शाहूंनी आपले सारे आयुष्य गोरगरीब पददलित जनतेच्या भल्यासाठी खर्ची घातले अशा थोर राजाच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार या घटकांसाठी काम करण्यासाठी नवी उमेद देणारा आहे.अण्णा हजारेज्येष्ठ समाजसेवक 

 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेkolhapurकोल्हापूर