शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

हिवाळी अधिवेशनात पॅकेजची घोषणा

By admin | Updated: December 3, 2014 00:41 IST

राज्यातील १९०४९ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात

मुनगंटीवार यांची ग्वाही : शेतकऱ्यांना मदत करणारनागपूर : राज्यातील १९०४९ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पॅकेजची घोषणा करू, अशी ग्वाही वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिली. टिळक पत्रकार भवनतर्फे आयोजित ‘मिट द पे्रस’ कार्यक्र मात ते बोलत होते.शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व विभागाकडून माहिती घेतली आहे. परंतु त्यांना थोडा धीर धरावा लागेल. जनताभिमुख सरकार ही आमची संकल्पना आहे. निवडणुकीत मतदारांनी जनादेश भाजपच्या बाजुने दिला. अपूर्णांकातून पूर्णांकात जाण्याचा प्रयत्न आहे. ३ लाख ४४४ हजार कोटींचे कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. २३ हजार कोटी त्यावरील व्याजापोटी जातात. पैसे नसले तरी आत्मविश्वास आहे. निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सर्व विभागांना मार्च महिन्यात खर्चाची वाईट सवय लागली आहे. परंतु आता या महिन्यात १५ टक्केहून अधिक खर्च करता येणार नाही. १२५० योजनांचे आजवर नियोजनच झालेले नाही. या योजना लोकांसाठी फायद्याच्या कशा आहेत. हे पटवून द्यावे लागेल. असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर अर्चना डेहनकर, श्रीकांत देशपांडे, पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व सचिव अनुपम सोनी आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)केळकर समितीचा अहवाल मांडणारहिवाळी अधिवेशनात केळकर समितीचा अहवाल मांडला जाईल. सिंचन प्रकल्पासंदर्भात आरोप आहेत. यात जो दोषी कोणी असेल त्यांच्या विरोधात कायदा आपले काम करेल. मात्र काही कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.सेना-भाजपने एकत्र यावेराज्यात भाजपचे बहुमत असले तरी शिवसेनेसोबत राज्य चालविण्याची आमची इच्छा आहे. शिवसेना-भाजप एकत्र येऊन सेना लवकरच सत्तेत सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.