शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
3
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
4
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
5
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
6
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
7
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
8
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
9
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
10
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
11
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
12
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
13
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
14
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
15
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
16
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
17
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
18
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
19
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
20
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी

रिपाइंच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा

By admin | Updated: January 30, 2015 05:15 IST

गटातटांत विभागलेल्या रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने नव्याने सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे.

मुंबई : गटातटांत विभागलेल्या रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने नव्याने सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखलेल्या नियमावलीनुसार रिपाइंची पुनर्बांधणी करण्यासाठी राज्यभर हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे रिपब्लिकन नेते काकासाहेब खंबाळकर यांनी सांगितले. गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नव्या कार्यकारिणीची घोषणा करताना रिपाइंच्या नावाने गटबाजी करणाऱ्या नेत्यांनी स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे पाडल्याची टीका खंबाळकर यांनी केली. ते म्हणाले, ‘नियमानुसार दर तीन वर्षांनी पक्षांतर्गत निवडणुका होऊन सर्व धर्म आणि जातीच्या कार्यकर्त्यांना पक्षात संधी देण्याची आवश्यकता आहे. मात्र बाबासाहेबांच्या नावाने कैक रिपब्लिकन नेत्यांनी रिपाइंच्या नावाने पक्ष काढून जनतेची फसवणूक केली आहे. या नेत्यांनी स्वत:ला आणि नातेवाइकांना सत्तेत वाटा मिळाल्यानंतर कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांचा विचारच केला नाही. मात्र आता पक्षाची पुनर्बांधणी करताना बाबासाहेबांच्या नियमावलीचे पालन करून राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय कोणतीही व्यक्ती आजन्म अध्यक्ष म्हणून राहणार नाही, याचीही काळजी घेण्यात येईल.’लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभर सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नव्या कार्यकारिणीत खंबाळकर यांनी कोणतेही पद घेतले नसून राष्ट्रीय अध्यक्षपदी समाधान नारकर यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी रा.सू. गवई आणि के.एस. अहिरे उपस्थित होते.