शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

गाजावाजा न करता उभारतेय लाखभर वस्तिमित्रांचे ‘अनुलोम’

By यदू जोशी | Updated: January 4, 2018 05:52 IST

कुठेही गाजावाजा, प्रसिद्धी नाही अन् श्रेयवादाची लढाई नाही, हे तत्त्व अंगीकारत, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे तब्बल ७५ हजार वस्तिमित्रांचे एक जाळे ‘अनुलोम’ या नावाने महाराष्ट्रात उभारण्यात आले असून

मुंबई - कुठेही गाजावाजा, प्रसिद्धी नाही अन् श्रेयवादाची लढाई नाही, हे तत्त्व अंगीकारत, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे तब्बल ७५ हजार वस्तिमित्रांचे एक जाळे ‘अनुलोम’ या नावाने महाराष्ट्रात उभारण्यात आले असून, लवकरच ते लाखाचा टप्पा गाठणार आहे.‘अनुलोम’ म्हणजे अनुगामी लोकराज्य महाअभियान. रयतेच्या राज्याची संकल्पना खºया अर्थाने सिद्ध व्हावी, यासाठी सरकारच्या प्रयत्नांना समर्थ साथ देण्याच्या उद्देशाने ‘अनुलोम’ची संकल्पना साकार झाली आहे. हे सरकार आपले आहे, अशी भावना सामान्यांच्या मनात निर्माण करण्याचा उद्देशही आहेच.बड्या कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे पॅकेज हाती असताना ते क्षणात बाजूला सारून, ‘अनुलोम’ची उभारणी केली, ती उच्चशिक्षित असलेले अतुल वझे यांनी. ते ‘अनुलोम’चे सीईओ आहेत. ते, पंकज पाठक, स्वानंद ओक अशांनी एकत्रित येऊन गेल्या दोन वर्षांत हे जाळे विणले. प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक, प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक आणि सहा लोकसभा मतदार संघ मिळून एक अशा ३५४ जनसेवकांची भक्कम फळी तयार करण्यात आली. प्रत्येक जनसेवकाने दररोज किमान १० जणांना अभियानात जोडले. त्यातून हजारो कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने सोबत आले. अनुलोममधील वस्तिमित्र कुठल्याही मानधनाशिवाय कामे करतात. जे प्रमुख लोक आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहाची तजवीज सीएसआर फंडातून केली जाते. शासकीय योजनांबाबत जनसेवक आणि वस्तिमित्रांना अद्ययावत माहिती असावी, म्हणून त्यांना दर ३ महिन्यांनी प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी विविध विभागांच्या शासकीय अधिकाºयांची मदत घेतली जाते.अतुल वझे आणि त्यांच्या सहकाºयांनी मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी श्रीकांत भारतीय यांच्या माध्यमातून, काही महिन्यांपूर्वी ‘अनुलोम’च्या संकल्पनेचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केले. मुख्यमंत्र्यांच्या सदिच्छांचे भक्कम पाठबळ आज ‘अनुलोम’च्या मागे आहे.५ हजार तलावांतील गाळ नेणार शेतांमध्येतलावांची साठवण क्षमता वाढेल आणि शेतीही सुपीक होईल, या उद्देशाने राज्यातील हजारो पाझर तलावांमधील गाळ काढून, तो शेतामध्ये नेण्याची योजना राज्य शासनाने आखली आहे. ‘अनुलोम’मधील वस्तिमित्र आता येत्या फेब्रुवारी ते मे-जूनपर्यंत तब्बल ५ हजार तलावांमधील गाळ काढून शेतीवर नेण्यासाठी खपणार आहेत. त्यासाठी लोकसहभाग घेतला जाईल.काटेकोर आचारसंहितासमाजातील शेवटच्या माणसाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी धडपड करणाºया वस्तिमित्रांसाठी एक आचारसंहिता घालून देण्यात आली आहे. ती म्हणजे, कुठेही शासकीय यंत्रणेवर दादागिरी करायची नाही. ‘माहिती नाही का, मी वस्तिमित्र आहे म्हणून!’असा अहम् भाव येऊ द्यायचा नाही. यंत्रणेशी सहकार्य करून साध्य गाठायचे. आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाते.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र