शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

गाजावाजा न करता उभारतेय लाखभर वस्तिमित्रांचे ‘अनुलोम’

By यदू जोशी | Updated: January 4, 2018 05:52 IST

कुठेही गाजावाजा, प्रसिद्धी नाही अन् श्रेयवादाची लढाई नाही, हे तत्त्व अंगीकारत, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे तब्बल ७५ हजार वस्तिमित्रांचे एक जाळे ‘अनुलोम’ या नावाने महाराष्ट्रात उभारण्यात आले असून

मुंबई - कुठेही गाजावाजा, प्रसिद्धी नाही अन् श्रेयवादाची लढाई नाही, हे तत्त्व अंगीकारत, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे तब्बल ७५ हजार वस्तिमित्रांचे एक जाळे ‘अनुलोम’ या नावाने महाराष्ट्रात उभारण्यात आले असून, लवकरच ते लाखाचा टप्पा गाठणार आहे.‘अनुलोम’ म्हणजे अनुगामी लोकराज्य महाअभियान. रयतेच्या राज्याची संकल्पना खºया अर्थाने सिद्ध व्हावी, यासाठी सरकारच्या प्रयत्नांना समर्थ साथ देण्याच्या उद्देशाने ‘अनुलोम’ची संकल्पना साकार झाली आहे. हे सरकार आपले आहे, अशी भावना सामान्यांच्या मनात निर्माण करण्याचा उद्देशही आहेच.बड्या कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे पॅकेज हाती असताना ते क्षणात बाजूला सारून, ‘अनुलोम’ची उभारणी केली, ती उच्चशिक्षित असलेले अतुल वझे यांनी. ते ‘अनुलोम’चे सीईओ आहेत. ते, पंकज पाठक, स्वानंद ओक अशांनी एकत्रित येऊन गेल्या दोन वर्षांत हे जाळे विणले. प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक, प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक आणि सहा लोकसभा मतदार संघ मिळून एक अशा ३५४ जनसेवकांची भक्कम फळी तयार करण्यात आली. प्रत्येक जनसेवकाने दररोज किमान १० जणांना अभियानात जोडले. त्यातून हजारो कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने सोबत आले. अनुलोममधील वस्तिमित्र कुठल्याही मानधनाशिवाय कामे करतात. जे प्रमुख लोक आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहाची तजवीज सीएसआर फंडातून केली जाते. शासकीय योजनांबाबत जनसेवक आणि वस्तिमित्रांना अद्ययावत माहिती असावी, म्हणून त्यांना दर ३ महिन्यांनी प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी विविध विभागांच्या शासकीय अधिकाºयांची मदत घेतली जाते.अतुल वझे आणि त्यांच्या सहकाºयांनी मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी श्रीकांत भारतीय यांच्या माध्यमातून, काही महिन्यांपूर्वी ‘अनुलोम’च्या संकल्पनेचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केले. मुख्यमंत्र्यांच्या सदिच्छांचे भक्कम पाठबळ आज ‘अनुलोम’च्या मागे आहे.५ हजार तलावांतील गाळ नेणार शेतांमध्येतलावांची साठवण क्षमता वाढेल आणि शेतीही सुपीक होईल, या उद्देशाने राज्यातील हजारो पाझर तलावांमधील गाळ काढून, तो शेतामध्ये नेण्याची योजना राज्य शासनाने आखली आहे. ‘अनुलोम’मधील वस्तिमित्र आता येत्या फेब्रुवारी ते मे-जूनपर्यंत तब्बल ५ हजार तलावांमधील गाळ काढून शेतीवर नेण्यासाठी खपणार आहेत. त्यासाठी लोकसहभाग घेतला जाईल.काटेकोर आचारसंहितासमाजातील शेवटच्या माणसाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी धडपड करणाºया वस्तिमित्रांसाठी एक आचारसंहिता घालून देण्यात आली आहे. ती म्हणजे, कुठेही शासकीय यंत्रणेवर दादागिरी करायची नाही. ‘माहिती नाही का, मी वस्तिमित्र आहे म्हणून!’असा अहम् भाव येऊ द्यायचा नाही. यंत्रणेशी सहकार्य करून साध्य गाठायचे. आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाते.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र