शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

गाजावाजा न करता उभारतेय लाखभर वस्तिमित्रांचे ‘अनुलोम’

By यदू जोशी | Updated: January 4, 2018 05:52 IST

कुठेही गाजावाजा, प्रसिद्धी नाही अन् श्रेयवादाची लढाई नाही, हे तत्त्व अंगीकारत, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे तब्बल ७५ हजार वस्तिमित्रांचे एक जाळे ‘अनुलोम’ या नावाने महाराष्ट्रात उभारण्यात आले असून

मुंबई - कुठेही गाजावाजा, प्रसिद्धी नाही अन् श्रेयवादाची लढाई नाही, हे तत्त्व अंगीकारत, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे तब्बल ७५ हजार वस्तिमित्रांचे एक जाळे ‘अनुलोम’ या नावाने महाराष्ट्रात उभारण्यात आले असून, लवकरच ते लाखाचा टप्पा गाठणार आहे.‘अनुलोम’ म्हणजे अनुगामी लोकराज्य महाअभियान. रयतेच्या राज्याची संकल्पना खºया अर्थाने सिद्ध व्हावी, यासाठी सरकारच्या प्रयत्नांना समर्थ साथ देण्याच्या उद्देशाने ‘अनुलोम’ची संकल्पना साकार झाली आहे. हे सरकार आपले आहे, अशी भावना सामान्यांच्या मनात निर्माण करण्याचा उद्देशही आहेच.बड्या कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे पॅकेज हाती असताना ते क्षणात बाजूला सारून, ‘अनुलोम’ची उभारणी केली, ती उच्चशिक्षित असलेले अतुल वझे यांनी. ते ‘अनुलोम’चे सीईओ आहेत. ते, पंकज पाठक, स्वानंद ओक अशांनी एकत्रित येऊन गेल्या दोन वर्षांत हे जाळे विणले. प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक, प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक आणि सहा लोकसभा मतदार संघ मिळून एक अशा ३५४ जनसेवकांची भक्कम फळी तयार करण्यात आली. प्रत्येक जनसेवकाने दररोज किमान १० जणांना अभियानात जोडले. त्यातून हजारो कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने सोबत आले. अनुलोममधील वस्तिमित्र कुठल्याही मानधनाशिवाय कामे करतात. जे प्रमुख लोक आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहाची तजवीज सीएसआर फंडातून केली जाते. शासकीय योजनांबाबत जनसेवक आणि वस्तिमित्रांना अद्ययावत माहिती असावी, म्हणून त्यांना दर ३ महिन्यांनी प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी विविध विभागांच्या शासकीय अधिकाºयांची मदत घेतली जाते.अतुल वझे आणि त्यांच्या सहकाºयांनी मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी श्रीकांत भारतीय यांच्या माध्यमातून, काही महिन्यांपूर्वी ‘अनुलोम’च्या संकल्पनेचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केले. मुख्यमंत्र्यांच्या सदिच्छांचे भक्कम पाठबळ आज ‘अनुलोम’च्या मागे आहे.५ हजार तलावांतील गाळ नेणार शेतांमध्येतलावांची साठवण क्षमता वाढेल आणि शेतीही सुपीक होईल, या उद्देशाने राज्यातील हजारो पाझर तलावांमधील गाळ काढून, तो शेतामध्ये नेण्याची योजना राज्य शासनाने आखली आहे. ‘अनुलोम’मधील वस्तिमित्र आता येत्या फेब्रुवारी ते मे-जूनपर्यंत तब्बल ५ हजार तलावांमधील गाळ काढून शेतीवर नेण्यासाठी खपणार आहेत. त्यासाठी लोकसहभाग घेतला जाईल.काटेकोर आचारसंहितासमाजातील शेवटच्या माणसाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी धडपड करणाºया वस्तिमित्रांसाठी एक आचारसंहिता घालून देण्यात आली आहे. ती म्हणजे, कुठेही शासकीय यंत्रणेवर दादागिरी करायची नाही. ‘माहिती नाही का, मी वस्तिमित्र आहे म्हणून!’असा अहम् भाव येऊ द्यायचा नाही. यंत्रणेशी सहकार्य करून साध्य गाठायचे. आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाते.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र