शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

“गणपती शपथ सांगते की धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्यासाठीच...”; अंजली दमानियांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 14:37 IST

Anjali Damania Reaction On Dhananjay Munde: गेल्या काही दिवसांपासून बीड प्रकरणावरून अंजली दमानिया सातत्याने मोठे दावे, विधाने करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Anjali Damania Reaction On Dhananjay Munde: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला अटक करा, आरोपींना शिक्षा होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशा एकमुखी मागण्या बीडमध्ये काढण्यात आलेल्या विराट मोर्चामध्ये सहभागी सर्वपक्षीय नेते व सामान्य नागरिकांनी केल्या. सत्ताधारी नेत्यांसह विरोधक, सर्वधर्मीय लोकांनी हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभाग घेतला. आरोपींना अटक झाली नाही, तर हे आंदोलनाचे लोण राज्यभर पसरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

मोर्चात बीडसह परभणी, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड व अनेक जिल्ह्यांतून लोक, राजकीय नेते सहभागी झाले होते. सर्वांनीच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. मोर्चात ग्रामस्थांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. या प्रकरणी अंजली दमानिया यांनीही मोठे दावे केले होते. मीडियातील वृत्तानुसार, अंजली दमानिया यांना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती हवी असेल तर त्यांना मी माहिती देणार

अंजली दमानिया यांनी फरार आरोपीच्या संदर्भात जो मृत्यूचा दावा केलाय, त्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना नोटीसद्वारे करण्यात आल्या आहेत. याबाबत बोलताना, एसपींनी मी दिलेली माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली नसेल. म्हणून त्यांचे मला एक पत्र आले आहे. हे पत्र बघून मला आश्चर्य वाटले. पण स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती हवी असेल तर त्यांना मी माहिती देणार, असे दमानिया यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोनच गुन्हेगार आहेत असे नाही. बीडचे अन्य राजकारणी तितकेच गुन्हेगार आहेत. सगळ्यांविरोधात एकदम, एकत्रपणे आंदोलन करणे शक्य नाही, म्हणून याची सुरुवात धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यापासून करण्यात आली. गणपतीची शपथ घेऊन सांगते. गणपती हे माझे आराध्य आहेत, धनंजय मुंडेंचे एकट्याचा राजकारण संपवण्यासाठी हे आंदोलन नाही. तर जिथे असे गुन्हेगारीकरण सुरू आहे. त्यासाठी एक उदाहरण घालून देण्यासाठी हे आंदोलन आहे, असे दमानिया म्हणाल्या. आता अनेक ठिकाणी धनंजय मुंडे तयार होत असल्याने, राजकीय गुन्हेगारीकरण होत असल्याने ते थांबवणे गरजेचे आहे, अशी टीका दमानिया यांनी केली. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणanjali damaniaअंजली दमानियाDhananjay Mundeधनंजय मुंडे