शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पशुधनावर विघ्न! राज्यभरात लम्पीचे ३० बळी; २१५६ जनावरे बाधित, लक्षणे तपासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 10:54 IST

जनावरांचे सर्व बाजार, पशू प्रदर्शने, आंतरराज्य व राज्यांतर्गत गोवंशीय व महिषवर्गीय पशुवाहतूक, बैलगाडा शर्यती यावर बंदी. 

मुंबई : राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात दाखल झालेल्या जनावरांमधील लम्पी त्वचारोगाने पशुधनावर मोठे विघ्न आले आहे. राज्यात ३१ जनावरांचा बळी घेतला असून २,१५६ जनावरे बाधित झालेली आहेत. अन्य जिल्ह्यांमध्ये याचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत.

काय केल्या उपाययोजना?राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित. जनावरांचे सर्व बाजार, पशू प्रदर्शने, आंतरराज्य व राज्यांतर्गत गोवंशीय व महिषवर्गीय पशुवाहतूक, बैलगाडा शर्यती यावर बंदी. पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पी प्रादुर्भाव झालेल्या गावापासून ५ किमी परिघातील क्षेत्रामध्ये लसीकरण.बाहेरून जनावरे खरेदी करून आणण्यास बंदी.

प्राण्यांपासून संक्रमित होत नाहीहा संसर्गजन्य रोग असल्याने उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी ठरते.लम्पीचे शेळ्या-मेंढ्यांमधील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या-मेढ्यांना होत नाही. हा आजार जनावरांपासून मानवात संक्रमित होत नाही. देशीपेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याची शक्यता अधिक.

कुठून कुठे पसरला?राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्ट २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये लम्पीची लागण झाली. त्यानंतर हा राेग झपाट्याने अहमदनगर, धुळे, अकोलासह पुणे, काेल्हापूर, सातारा, सांगली व साेलापूर या जिल्ह्यांमध्येही झपाट्याने पसरला.

अशी घ्या खबरदारी

बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्याची व्यवस्थित स्वच्छता ठेवावी. आजारसदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा.जनावरांना लक्षणे आढळल्यास तत्काळ पशुवैद्यकांना दाखवावे. 

या २० जिल्ह्यांत पसरला प्रादुर्भाव, लक्षणे तपासा

जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी

तोंडात, घशात व श्वसननलिका, फुप्फुसांत पुरळ व फोड

जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळती

जनावरांना अशक्तपणा येतो व भूक मंदावते, डोळ्यांमध्ये जखमा तयार होतात

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग