शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

“आम्ही जनतेलाही बांधील, सरकार गप्प बसणार नाही”; अनिल परबांचा ST संपकऱ्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 19:24 IST

एसटी संपाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नसून, सरकार आणि कर्मचारी आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ST कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप पूर्णपणे तोडगा निघालेला नाही. काही भागातील एसटी सेवा सुरू झाली असली तरी बऱ्याच ठिकाणची एसटीची सेवा ठप्प आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे, यासाठी सरकारकडून अनेकदा आवाहन करण्यात आले आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या विलिनीकरणावर कर्मचारी ठाम आहेत. यातच राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पुन्हा एकदा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. आम्ही जनतेलाही बांधील आहोत. आता सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. 

सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही. मेस्मा लावण्याबाबत बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. तसेच, याबाबत वेगवेगळ्या पर्यायांवर विचार सुरू असून आमचे दायित्व जसे कर्मचाऱ्यांशी तसे ते जनतेशीदेखील आहे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जातेय

एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. सदावर्ते यांचे काही नुकसान होत नाही, अशी टीका अनिल परब यांनी केली आहे. किरीट सोमय्या करत असलेल्या टीकेबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की, किरीट सोमय्यांना उत्तर देण्यास बाधिल नसून, संबंधित यंत्रणांना दिले आहे. सोमय्यांनी मुख्यमंत्री, महाविकास आघाडी आणि माझी बदनामी करण्याचा धंदा सुरू केला आहे. याबाबत कोर्टात दावा दाखल केला आहे. त्यांमुळे किरीट सोमय्यांना माफी तरी मागावी लागेल किंवा १०० कोटी तरी द्यावे लागतील, असे अनिल परब यांनी सांगितले. 

दरम्यान, महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसून कॅबिनेटमध्ये निवडणुका पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेण्यात झाल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :ST Strikeएसटी संपAnil Parabअनिल परब