शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

...अन् ‘शतावरी’ने केले लखपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 09:01 IST

यशकथा :  व्यापाऱ्याने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे गावाकडे येऊन त्याने आपल्या शेतात शतावरी लावली अन् आज तो लखपती झाला. 

- शेखर देसाई, लासलगाव, जि.नाशिक 

निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथील एक युवा शेतकरी बहिणीला भेटण्यासाठी मुंबईला गेला. पाहुण्यांच्या माध्यमातून मुंबईतील एका व्यापाऱ्याशी त्याचा परिचय झाला. व्यापाऱ्याने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे गावाकडे येऊन त्याने आपल्या शेतात शतावरी लावली अन् आज तो लखपती झाला. ही यशोगाथा आहे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील खानगाव थडीच्या दीपक पगारे या तरुण शेतकऱ्याची.

२८ वर्षीय  शेतकरी दीपक पगारे यांची स्वत:च्या मालकीची पाच एकर शेती आहे.     कांदे, सोयाबीन, ऊस अशी पारंपरिक पिके ते घेत होते. या माध्यमातून त्यांना वर्षाकाठी साधारणत: दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असे. दीपक मुंबईला असलेल्या बहिणीला भेटण्यासाठी  गेले होते. तेथे मुंबईच्या काही व्यापाऱ्यांशी त्यांचा परिचय झाला. त्यापैकी एका व्यापाऱ्याने शतावरीचे पीक घेण्याचा सल्ला दिला. शतावरी या औषधी वनस्पतीविषयी दीपक यांना काहीही माहिती नव्हती. या व्यापाऱ्यानेच त्यांना सर्व माहिती देऊन विक्रीची पद्धतही समजावून सांगितली. विशेष म्हणजे, शतावरीचे बियाणेही त्यांनीच दिले. 

दीपक यांनी शतावरी लावण्याचा निर्णय घेतला आणि कामाला सुरुवातही केली. सुरुवातीला व्यापाऱ्याने दिलेल्या बियाणांची नर्सरीतून रोपे तयार करून घेतली. जमिनीची नांगरट करून, कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत केली. एकरी ४ ते ५ गाड्या शेणखत घातले. त्यानंतर पाच फूट अंतराने एक फूट खोल व एक फूट रूंद असे चर खोदले. चरातील माती काढून निम्म्या मातीत शेणखत मिसळून ती त्याच चरात निम्म्याने भरली व उरलेली माती रोपे भरताना वापरली. एकरात ४३२ प्रमाणे सहा हजार रोपे अशी ३० हजार रोपे लावली. सुरुवातीला त्यांना एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च आला. पहिले ३-४ दिवस ठिबकने हलके पाणी दिले. लागवड केलेल्या  दोन महिन्यांच्या रोपांना लागवडीनंतर चार महिन्यांनी तुरे येऊ लागले. तुऱ्यांनी डवरलेल्या कांड्या हेच शतावरीचं पीक. 

आता दर दिवसाआड  ते तोडणी करतात आणि मुंबईला त्याच व्यापाऱ्याकडे पाठवितात. साधारण वीस किलोचा एक बॉक्स असे दोन बॉक्स मिळून चाळीस किलो शतावरी नाशिक येथून ट्रान्स्पोर्टने पाठविली जाते. शंभर रुपये किलोच्या भावाने चाळीस किलोला सरासरी चार हजार रुपये त्यांना मिळतात. याप्रमाणे महिन्याला सहाशे किलो माल पाठविला जातो. त्याचे ६० हजार रुपये होतात, तर वर्षाला ७ ते ८ लाख रुपये  मिळतात. चार वर्षांपासून त्यांना शतावरीचे उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे, या पिकासाठी त्यांना एकाच वेळी खर्च करावा लागला. त्यानंतर चार वर्षांत  आतापर्यंत त्यांना एकूण २८ ते ३० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. दीपक पगारे यांनी आपल्या शेतात पाच एकरवर चार टप्प्यांत शतावरीची लागवड केली. संपूर्ण पीक लागवडीसाठी साधारणत: तीन लाख रुपयांपर्यंत खर्च आला. या पिकाला एकाचवेळी खर्च करावा लागतो. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी