शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

कृतज्ञतेचा अमृतमहोत्सव

By admin | Updated: December 13, 2015 02:47 IST

माझ्यासारखा एक सामान्य माणूस इथपर्यंत पोहचतो, हा भारतीय लोकशाहीचा चमत्कार आहे. त्यामुळे अशा या लोकशाहीला मजबूत करणे, तिचा सन्मान वाढविणे आणि शेवटच्या

मुंबई : माझ्यासारखा एक सामान्य माणूस इथपर्यंत पोहचतो, हा भारतीय लोकशाहीचा चमत्कार आहे. त्यामुळे अशा या लोकशाहीला मजबूत करणे, तिचा सन्मान वाढविणे आणि शेवटच्या व्यक्तिपर्यंत लोकशाहीची बांधिलकी पोहचविण्याचे काम यापुढील आयुष्यात करणार असल्याची कृतज्ञ ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नेहरु सेंटर येथील नागरी सत्काराला उत्तर देताना दिली. शरद पवार यांचा पंचाहत्तरीनिमित्त मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये समाजाच्या सर्वच स्तरातील मान्यवर व पवारप्रेमींनी मोठी गर्दी केली. व्यासपीठावर पवारांप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करीत आठवणी जागविणारे नेते आणि मान्यवर. तर, प्रेक्षागृहात पहिल्या रांगेत बसून सपत्नीक हा सोहळा अनुभवणारे पवार, असा अनोखा कार्यक्रम नेहरू सेंटरमध्ये पाहायला मिळाला. या कृतज्ञता सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना रिलायन्सचे मुकेश अंबानी म्हणाले की, ‘फक्त आणि फक्त उद्योग-व्यवसाय असे एकांगी आयुष्य नसावे. जीवनात समतोल हवा. मी राजकारणी असूनही कला-साहित्याची आवड बाळगतो, असा मौलिक सल्ला पवारांनी आपणास दिला. त्यांच्यामुळेच आयुष्यात समतोल साधू शकलो, असे अंबानी म्हणाले. तर, पाठिशी एक आमदार असणारा इथे कसा, बरं आला तर मग थेट व्यासपीठावर कसा, असे प्रश्न अनेकांच्या मनात सध्या असतील. पण याबाबत तुम्ही सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेलांना विचारा, अशी सुरुवात कर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी सभागृहाचा नूरच बदलून टाकला. राज ठाकरेंचे हे मिश्किल भाषण सुरु असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात प्रवेश करत होते. तेंव्हा ‘हे पाहा आमचे बंधु आले’, असे म्हणत राज त्यांचे स्वागत करत छान ‘पॉझ’ घेतला. ‘काय टायमिंग आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. व्यासपीठावर स्थानापन्न होण्यापूर्वी उद्धव हस्तांदोलनासाठी राज यांच्या जवळ गेले. पवारांच्या सोहळ्यातील क्षणभराच्या या उद्धव-राज भेटीने उपस्थित भारावून गेले. यानंतर बोलताना राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणाले, पवारांनी सार्वजनिक कामात कधीच पक्षपात केला नाही. ९३ चे बॉम्बस्फोट असो अथवा किल्लारी भूकंप महाराष्ट्राला सावरण्याचे काम पवारांनी केले. दस्तुरखुद्द माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या या कौशल्याची दखल घेत आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी पवारांवर सोपविली. याहून मोठे प्रशस्तीपत्रक कोणते असेल. राज यांच्या वक्तव्याचा धागा पकडून ते म्हणाले, राज तुमच्याकडे एक आमदार असला म्हणून काय झाले. आमचे तर दोनच (खासदार) होते, वेळ बदलेल. दिल्लीपर्यंत जाल, वाटल्यास एकत्र जाऊ. समोर पवारांचा आदर्श ठेवा. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला. निवडणुकीत एकमेकांचे वाभाडे काढणारे सगळे नेते आज व्यासपीठावर पवारांचे कौतुक करतायत. याचे काहींना आश्चर्य वाटेल. पण, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्रत्येक ठिकाणी दुस्वास करणे, ही आपली परंपरा नाही. अविश्रांत कष्ट ही पवारांची ओळख आहे. ते कधी झोपत असतील का असा प्रश्न मला पडतो. अनेकांची झोप उडविणाऱ्या पवारांनी स्वत: जागे राहात अनेकांना जागते रहो, करायला लावले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ४० वर्षांच्या राजकीय प्रवासात शरद पवारांनी करंगळी पकडली आणि एक सब-इन्स्पेक्टर देशाचा गृहमंत्री कसा झाला, हेही मला उमगले नाही. त्यांनी राजकारणात अनेकांना घडविले. आम्हाला घडविले. महाराष्ट्र घडवायचा असेल तर टीकेला महत्व न देता लोकांना सोबत घ्यायची शिकवण दिली.पवारसाहेब तुम्ही आमचे खरे नेते आहात. आम्ही तुमचे ‘फॉलोअर’ असे भावोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी काढले. तर, पवार हे खरे राष्ट्रसेवक आहेत. देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्यांने त्यांचे सहाय्य घेतले. असा नेता एक-दोन वर्षात घडत नाही. ते तपस्येचे फळ आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले. यावेळी राज्यपालांनी अस्सल मराठीत आपल्या दोन इच्छा बोलून दाखविल्या. एक म्हणजे पवारांना दीर्घायुष्य लाभावे आणि वयाची शंभरी पार करावी. आणि दुसरी म्हणजे शंभरीचा सोहळा पाहाण्याचे भाग्य आम्हाला लाभावे. (प्रतिनिधी)राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छावाढदिवसानिमित्त शरद पवार यांनी रविवारी सकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यातील आपल्या चाहत्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेतली. सकाळी ९ ते दपारी १ असे सलग चार तास राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी पवारांवर अक्षरश: शुभेच्छांचा वर्षाव केला. पवारांनी न थकता प्रत्येकाचे हसतमुखाने या शुभेच्छांचा स्वीकार केला. कुणाची आस्थेने चौकशी तर कुणाची फोटोची हौस पवारांनी न कंटाळता भागविली. पवारांची कन्या खा. सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सचिन अहिर आदी नेते उत्साहाने कार्यक्रमाची व्यवस्था पाहत होते. सर्वच नेते लगबगीने सभागृहभर फिरत ‘सारं सुरळीत होतंय ना’ याकडे लक्ष देत होते.