शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अमरावतीची फॅशन डिझायनर रुपल ‘मिसेस इंडिया अर्थ’च्या फायनलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 19:18 IST

प्रतीष्ठेची मानली जाणारी ‘मिसेस इंडिया अर्थ’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमरावतीची रुपल गुडढे-बोके हिने स्थान मिळविले आहे.

अमरावती, दि. 20 : प्रतीष्ठेची मानली जाणारी ‘मिसेस इंडिया अर्थ’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमरावतीची रुपल गुडढे-बोके हिने स्थान मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त असणारी ही सौंदर्य स्पर्धा भारतीय वंशज असणा-या सौभाग्यवतींसाठीच आयोजित केली जाते. आठ वर्षांच्या मुलीची आई असणारी रुपल ही पेशाने फॅशन डिझायनर आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. यानंतर तिने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केले. सन २००७ साली सागर बोके यांच्याशी तिचा विवाह झाला. जगभरातून मिसेस इंडिया अर्थ या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या ४८ स्पर्धकांमध्ये रुपलने आपली निवड सार्थ ठरवीत अंतिम फेरी गाठली. ६ आॅक्टोबर रोजी स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी निवड झालेली ती पहिली अमरावतीकर ठरली आहे. रुपल येथील विनोद व अलका गुडधे यांंची कन्या आहे. सध्या ती तिचे पती सागर बोके यांच्यासह मुंबईत स्थायिक आहे.

मागील पाच वर्षांपासून ती फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करीअर करीत असून टीव्ही मालिका व अनेक मोठ्या ईव्हेंटसाठी वस्त्रे डिझाईन केली आहेत. नुकताच तिने आपला नवीन ब्रँडही बाजारात आणला आहे.  मी सर्वप्रथम एक आई आहे. त्यानंतर गृहिणी व उद्योजग आहे. ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करीत राहावे, माझ्या यशाचे श्रेय पती, आई-वडील व माझी मुलगी यांना आहे असे तिने ‘लोकमत’ला सांगितले.