शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
4
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
5
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
6
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
7
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
8
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
9
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
10
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
11
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
12
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
13
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
14
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
15
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
17
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
18
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
19
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
20
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?

अमरावतीच्या आयजींवर शिस्तभंग?

By admin | Updated: November 9, 2016 05:18 IST

मराठा असल्याने छळ होत आहे, त्यामुळे मी आत्महत्येचा विचार करत आहे, अशी धमकी देणारे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांना

मुंबई/अमरावती : मराठा असल्याने छळ होत आहे, त्यामुळे मी आत्महत्येचा विचार करत आहे, अशी धमकी देणारे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांना पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी तातडीनेमुंबईला पाचारण केले आहे, तर गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी यासंदर्भात अहवाल मागविला आहे. एकूण घडामोडी बघता जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.आयजी जाधव यांनी रविवारी रात्री काही पोलिस अधिकारी व मित्रांना व्हॉटसअ‍ॅप संदेश पाठवून ‘मराठा असल्याने माझा छळ होतोय आणि या छळाला कंटाळून मी आत्महत्या करेन. आत्महत्येसाठी डीजीपी जबाबदार राहतील’, अशी धमकी दिल्याने पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. यासंदर्भात मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच डीजीपी माथूर यांनी जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून अर्धा तास चर्चा केली. सविस्तर चर्चेकरिता त्यांनी जाधव यांना मुंबईला पाचारण केले आहे. लवकरच जाधव डीजीपींच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे. पोलिस दलाच्या आचारसंहितेनुसार वरिष्ठांवर जाहीरपणे आरोप करता येत नाहीत. त्यामुळे या प्रकरणात जाधव यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी.बक्षी यांनी पत्रकारांना सांगितले की जाधव यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात अहवाल देण्यास माथूर यांना राज्य शासनाने सांगितले आहे. ते लवकरच अहवाल देतील. माथूर यांना जाधव प्रकरणी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दिली होती. तथापि, पोलीस गृहनिर्माणबाबत राज्य मंत्रिमंडळासमोर आज सादरीकरण होते आणि त्यासाठी माथूर यांना बोलविलेले होते. हे पूर्वनियोजितच होते, असा खुलासा माहिती व जनसंपर्क विभागाने केला. सांगली : माझ्याकडे गृह खाते होते, त्यावेळी पोलिसांमध्ये अंडरकरंट प्रांतीयवाद होता. मराठा नव्हे, तर मराठी भाषिक पोलिसांना वेगळी वागणूक दिली जात होती. त्यामुळे विठ्ठल जाधव यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा गृह खात्याने केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, उत्तर आणि दक्षिण भारतीय पोलिस व स्थानिक मराठी भाषिक पोलिसांमध्ये वादाचा अंतर्प्रवाह होता. तो उघडपणे नसला तरी, त्याचे अस्तित्व जाणवत होते. जाधव यांनी अशाप्रकारची तक्रारी केली असेल, तर निश्चितपणे काही तरी घडले असणार. वरिष्ठ पदावरील व्यक्ती अशी खदखद व्यक्त करीत असेल, तर त्याची दखल घेतली पाहिजे.