शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या आयजींवर शिस्तभंग?

By admin | Updated: November 9, 2016 05:18 IST

मराठा असल्याने छळ होत आहे, त्यामुळे मी आत्महत्येचा विचार करत आहे, अशी धमकी देणारे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांना

मुंबई/अमरावती : मराठा असल्याने छळ होत आहे, त्यामुळे मी आत्महत्येचा विचार करत आहे, अशी धमकी देणारे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांना पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी तातडीनेमुंबईला पाचारण केले आहे, तर गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी यासंदर्भात अहवाल मागविला आहे. एकूण घडामोडी बघता जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.आयजी जाधव यांनी रविवारी रात्री काही पोलिस अधिकारी व मित्रांना व्हॉटसअ‍ॅप संदेश पाठवून ‘मराठा असल्याने माझा छळ होतोय आणि या छळाला कंटाळून मी आत्महत्या करेन. आत्महत्येसाठी डीजीपी जबाबदार राहतील’, अशी धमकी दिल्याने पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. यासंदर्भात मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच डीजीपी माथूर यांनी जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून अर्धा तास चर्चा केली. सविस्तर चर्चेकरिता त्यांनी जाधव यांना मुंबईला पाचारण केले आहे. लवकरच जाधव डीजीपींच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे. पोलिस दलाच्या आचारसंहितेनुसार वरिष्ठांवर जाहीरपणे आरोप करता येत नाहीत. त्यामुळे या प्रकरणात जाधव यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी.बक्षी यांनी पत्रकारांना सांगितले की जाधव यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात अहवाल देण्यास माथूर यांना राज्य शासनाने सांगितले आहे. ते लवकरच अहवाल देतील. माथूर यांना जाधव प्रकरणी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दिली होती. तथापि, पोलीस गृहनिर्माणबाबत राज्य मंत्रिमंडळासमोर आज सादरीकरण होते आणि त्यासाठी माथूर यांना बोलविलेले होते. हे पूर्वनियोजितच होते, असा खुलासा माहिती व जनसंपर्क विभागाने केला. सांगली : माझ्याकडे गृह खाते होते, त्यावेळी पोलिसांमध्ये अंडरकरंट प्रांतीयवाद होता. मराठा नव्हे, तर मराठी भाषिक पोलिसांना वेगळी वागणूक दिली जात होती. त्यामुळे विठ्ठल जाधव यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा गृह खात्याने केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, उत्तर आणि दक्षिण भारतीय पोलिस व स्थानिक मराठी भाषिक पोलिसांमध्ये वादाचा अंतर्प्रवाह होता. तो उघडपणे नसला तरी, त्याचे अस्तित्व जाणवत होते. जाधव यांनी अशाप्रकारची तक्रारी केली असेल, तर निश्चितपणे काही तरी घडले असणार. वरिष्ठ पदावरील व्यक्ती अशी खदखद व्यक्त करीत असेल, तर त्याची दखल घेतली पाहिजे.