शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सातारी त्यागापुढे फिल्मी ‘आमिरी’ फिकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2015 00:37 IST

देश सोडून जाण्याची भाषा : खान पती-पत्नीवर सोशलमीडिया चवताळली, स्वाती महाडिकांच्या देशप्रेमाचा दिला गेला दाखला

सातारा : सुप्रसिध्द अभिनेता आमिर खानच्या पत्नीने देश सोडण्याची भाषा केल्याचे प्रसारमाध्यमातून झळकताच सोशलमीडियावर प्रचंड गदारोळ निर्माण झाला. खान पती-पत्नीवर टीकाटिप्पणी सुरू झाली. मात्र, देशप्रेमाची उदाहरणे देताना साताऱ्याचे शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नीने मुलांना लष्करात पाठविण्याचा निर्णय सोशलमीडियावर व्हायरल झाला. पोगरवाडीतील देशसेवेच्या श्रीमंतीपुढे चित्रतारकांची ‘आमिरी’ फिकी पडल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले.आमिर खानच्या पत्नीने केलेले वक्तव्य आणि वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी केलेली घोषणा यांची तुलना करत आज दिवसभर सोशल मीडियावर रान पेटले. कोणी याचे समर्थन केले तर कोणी बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आमिरवर शाब्दिक आसूड ओढला. दिवसभर अनेक ग्रुपवर आणि वैयक्तिकही अनेकांनी यावर मतांतरे नोंदविली. विशेष म्हणजे, एकीकडे आमिर खान व त्याची पत्नी किरण राव यांचे फोटो तर दुसरीकडे वीरपत्नी स्वाती महाडिक व त्यांची दोन मुले यांचा फोटो जोडून वेगवेगळ्या पोस्टही सोशलमीडियावर प्रचंड प्रमाणात फॉरवर्ड झाल्या. देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्यामुळे देश सोडून जाण्याची भाषा करणारी अभिनेता आमिर खानची पत्नी किरण राव एकीकडे तर, सीमेवर दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेल्या पतीच्या पश्चात आपली दोन्ही मुलं फौजेत पाठविण्याची धाडसी इच्छा व्यक्त करणाऱ्या स्वाती महाडिक दुसरीकडे! एकीला काळजी आहे आपल्या मुलाची तर दुसरीला जाण आहे मातृभूमीच्या रक्षणाची! याचीही चर्चा फेसबुक, टिष्ट्वटर अन् व्हॉटस्अ‍ॅपवर दिवसभर रंगली. विशेष म्हणजे, सार्वजनिक ग्रुपवर सहसा व्यक्त न होणारी मंडळीही मंगळवारी तावातावाने आपल्या प्रतिक्रिया मांडताना सातारकरांना पाहावयास मिळाली. (प्रतिनिधी)आमिरच्या विरोधातली पोस्ट...आमिर....तुला सरफरोशमधला तो खेडा नाकावाला सीन आठवतो? इन्स्पेक्टर सलीमचा तू पाणउतारा केलेला असतोस. मेरा घर (देश) बचाने के लिए, मुझे किसी सलीम की जरूरत नहीं, असं बोलतोस. तरीही, तो तुला म्हणजे एसीपी राठोडला खेडा नाक्यावर येणाऱ्या गुन्हेगारांची टीप देतो. तू त्यांना पकडतोस. सलीम जायला लागतो. तू त्याला अडवतोस. त्याची माफी मागतोस. तेव्हा सलीम म्हणतो....दस नहीं दस हजार सलीम मिलेंगे मगर फिर कभी किसी सलीम से ये मत कहना के ये मुल्क उसका घर नहीं है. किरण... तुझी बायको कदाचित म्हणून गेलीही असेल, पण तुला काय वाटलं-वाटतं? देश सोडून जाण्याची वेळ येणं, हे काय असतं ते मध्य आशियातल्या देशांतल्या नागरिकांना विचार. तुझे कॉन्टॅक्ट्स असतीलच म्हणा.. तुझ्या एका वाक्यानं तू या आपल्या भारताला थेट सीरिया, अफगाणिस्तानच्या रांगेत आणून बसवलंस? विसरलास तो इन्क्रिडिबल इंडिया? परदेशी पर्यटकांना न फसवणारे स्थानिक..... परदेशी महिलेला वाचवणारा सरदारजी... आमिर.. याला म्हणतात सुख बोचणं!आमिरच्या समर्थनार्थ प्रतिक्रियाकिरण आणि आम्ही सबंध आयुष्यभर भारतात राहिलो, राहत आहोत; परंतु प्रथमच किरण मला म्हणाली, आपण भारत सोडून जाऊ या का? आणि हे खूप धक्कादायक आणि प्रचंड भयानक विधान आहे (याचा अर्थ मी देश सोडून जातो असे आमीर म्हणाला असा होत असेल तर आपल्या आकलन कौशल्याला सलाम ! साष्टांग नमस्कार ! ) तिला तिच्या मुलाची चिंता वाटते. तिला आजूबाजूच्या वातावरणाची भीती वाटते. दररोजचं वर्तमानपत्र उघडताना तिच्या मनात धास्ती असते. आजूबाजूला किती भीतीदायक, अशांततेचं वातावरण आहे, याचं हे निदर्शक आहे! किरणच्या मनात असा विचार येणंसुध्दा किती धक्कादायक आहे, असं आमिर म्हणतोय आणि मी देश सोडून जाणार, असं आमिर म्हणाला, अशी आवई ठोकली आहे. वाह रे वा भक्त लोक.माझे पती कर्नल संतोष देशासाठी लढत असताना शहीद झाले. त्यांचाच आदर्श घेऊन माझ्या दोन्ही मुलांनाही मी लष्करात दाखल करणार आहे. नियमात बसल्यास मीही सैन्यात जाण्यासाठी तयार आहे. माझी पत्नी किरण घरी बोलताना म्हणते की, देशातल्या सध्याच्या वातावरणामुळे आपल्या मुलांबद्दल भीती वाटते. अशांतता, निराशेचे वातावरण वाढत आहे. आपण भारताबाहेर जायचे काय?