शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अंबरनाथ : दफनविधीसाठी महिलेच्या मृतदेहाला 20 तास करावी लागली प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 20:57 IST

एका महिलेचा मृतदेह दफन करण्यासाठी मुस्लीम धर्मियांनी अंबरनाथच्या  दफनभूमीत आणला. मात्र त्या ठिकाणी देखील जागेची कमतरता असल्याने त्यास अंबरनाथच्या मुस्लीम समाजाने विरोध केला.

अंबरनाथ : उल्हासनगरमध्ये मुस्लीम धर्मियांची दफनभूमी नसल्याने या शहरातील मुस्लीम बांधवांना दफनविधीसाठी इतर शहरांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. असाचा प्रकार काल एका महिलेच्या बाबतीत घडला. एका महिलेचा मृतदेह दफन करण्यासाठी मुस्लीम धर्मियांनी अंबरनाथच्या  दफनभूमीत आणला. मात्र त्या ठिकाणी देखील जागेची कमतरता असल्याने त्यास अंबरनाथच्या मुस्लीम समाजाने विरोध केला. तब्बल २० तास या विषयावर चर्चा केल्यावर अंबरनाथमध्येच त्या महिलेला दफन करण्यात आले. मात्र या पुढे उल्हासनगरमधील मुस्लीम धर्मियांचा दफनविधी अंबरनाथमध्ये करू दिला जाणार नाही अशी ठाम भूमीका अंबरनाथ मुस्लीम जमातीने घेतली आहे. 

उल्हासनगर महानगर पालिकेत दफनभूमी नसल्याने या ठिकाणी राहणा-या मुस्लीम बांधवांची मोठी गैरसोय होत आहे. मृत व्यक्तींना दफन करणार कोठे असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अनेकवेळा दफनभूमीच्या नावावर संघर्ष देखील निर्माण झाला आहे. असाच संघर्ष पुन्हा एकदा निर्माण झाला. मात्र, हा संघर्ष उल्हासनगरमध्ये घडला नसून अंबरनाथमध्ये घडला आहे.  उल्हासनगरमधील मुस्लीम महिला सईद युन्नीसा खान या महिलेचा मृत्यू बुधवारी झाला होता. उल्हासनगरमध्ये दफनभूमी नसल्याने हे प्रेत थेट अंबरनाथच्या कब्रस्थानमध्ये आणण्यात आला. मात्र अंबरनाथमधील दफनभूमी ही अंबरनाथकरांनाच अपुरी पडत आहे. जागा अपुरी असल्याने इतर शहरातील मृत्य व्यक्तींना दफन करणो शक्य होत नाही. येवढेच नव्हे तर दफन केलेल्या जागेवर वर्षभरातच पुन्हा दुसरे प्रेत दफन करण्याची वेळ आली आहे. आधी दफन गेलेले प्रेत पूर्णपणो विघटित होत नसल्याने दुसरे प्रेत दफन करण्यासाठी खड्डा खोदल्यावर अर्थवट विहटीत झालेले प्रेत निघतात. त्यामुळे अंबरनाथ मुस्लीम जमातीने बाहेरील शहरातील मृतदेह अंबरनाथमध्ये दफन करु दिले जाणार नाही अशी भूमीका घेतली आहे. ही भूमीका घेतल्यावर लागलीच बुधवारी उल्हासनगरमधील एका महिलेचा मृत्यू झाला. त्या महिलेला थेट दफनविधीसाठी अंबरनाथच्या दफनभूमीत आणन्यात आले. मात्र तेथे परवानगी न मिळाल्याने हा मृतदेह दफनविधीसाठी तब्बल 20 तास प्रतीक्षा करावी लागली. अखेर उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्तांना या प्रकरणात हस्तक्षेप करित महिला दिनाचे कारण पुढे करित या महिलेला दफन करण्याची विनंती केली. महिला दिन असल्याने अंबरनाथ मुस्लीम जमातीने देखील या महिलेला अंबरनाथमध्ये दफन करण्याची परवानगी दिली आहे. २० तासानंतर त्या महिलेला दफन करण्यात आले. 

या संदर्भात मुस्लीम जमातीचे प्रमुख सलिम चौधरी यांनी सांगितले की अंबरनाथमध्ये आधीच जागा नाही. ही जागा अंबरनाथकरांनाच कमी पडत आहे. त्यामुळे बाहेरील मृतदेह या ठिकाणी दफन करणो शक्य नाही. त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथ