शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

अंबरनाथ : दफनविधीसाठी महिलेच्या मृतदेहाला 20 तास करावी लागली प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 20:57 IST

एका महिलेचा मृतदेह दफन करण्यासाठी मुस्लीम धर्मियांनी अंबरनाथच्या  दफनभूमीत आणला. मात्र त्या ठिकाणी देखील जागेची कमतरता असल्याने त्यास अंबरनाथच्या मुस्लीम समाजाने विरोध केला.

अंबरनाथ : उल्हासनगरमध्ये मुस्लीम धर्मियांची दफनभूमी नसल्याने या शहरातील मुस्लीम बांधवांना दफनविधीसाठी इतर शहरांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. असाचा प्रकार काल एका महिलेच्या बाबतीत घडला. एका महिलेचा मृतदेह दफन करण्यासाठी मुस्लीम धर्मियांनी अंबरनाथच्या  दफनभूमीत आणला. मात्र त्या ठिकाणी देखील जागेची कमतरता असल्याने त्यास अंबरनाथच्या मुस्लीम समाजाने विरोध केला. तब्बल २० तास या विषयावर चर्चा केल्यावर अंबरनाथमध्येच त्या महिलेला दफन करण्यात आले. मात्र या पुढे उल्हासनगरमधील मुस्लीम धर्मियांचा दफनविधी अंबरनाथमध्ये करू दिला जाणार नाही अशी ठाम भूमीका अंबरनाथ मुस्लीम जमातीने घेतली आहे. 

उल्हासनगर महानगर पालिकेत दफनभूमी नसल्याने या ठिकाणी राहणा-या मुस्लीम बांधवांची मोठी गैरसोय होत आहे. मृत व्यक्तींना दफन करणार कोठे असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अनेकवेळा दफनभूमीच्या नावावर संघर्ष देखील निर्माण झाला आहे. असाच संघर्ष पुन्हा एकदा निर्माण झाला. मात्र, हा संघर्ष उल्हासनगरमध्ये घडला नसून अंबरनाथमध्ये घडला आहे.  उल्हासनगरमधील मुस्लीम महिला सईद युन्नीसा खान या महिलेचा मृत्यू बुधवारी झाला होता. उल्हासनगरमध्ये दफनभूमी नसल्याने हे प्रेत थेट अंबरनाथच्या कब्रस्थानमध्ये आणण्यात आला. मात्र अंबरनाथमधील दफनभूमी ही अंबरनाथकरांनाच अपुरी पडत आहे. जागा अपुरी असल्याने इतर शहरातील मृत्य व्यक्तींना दफन करणो शक्य होत नाही. येवढेच नव्हे तर दफन केलेल्या जागेवर वर्षभरातच पुन्हा दुसरे प्रेत दफन करण्याची वेळ आली आहे. आधी दफन गेलेले प्रेत पूर्णपणो विघटित होत नसल्याने दुसरे प्रेत दफन करण्यासाठी खड्डा खोदल्यावर अर्थवट विहटीत झालेले प्रेत निघतात. त्यामुळे अंबरनाथ मुस्लीम जमातीने बाहेरील शहरातील मृतदेह अंबरनाथमध्ये दफन करु दिले जाणार नाही अशी भूमीका घेतली आहे. ही भूमीका घेतल्यावर लागलीच बुधवारी उल्हासनगरमधील एका महिलेचा मृत्यू झाला. त्या महिलेला थेट दफनविधीसाठी अंबरनाथच्या दफनभूमीत आणन्यात आले. मात्र तेथे परवानगी न मिळाल्याने हा मृतदेह दफनविधीसाठी तब्बल 20 तास प्रतीक्षा करावी लागली. अखेर उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्तांना या प्रकरणात हस्तक्षेप करित महिला दिनाचे कारण पुढे करित या महिलेला दफन करण्याची विनंती केली. महिला दिन असल्याने अंबरनाथ मुस्लीम जमातीने देखील या महिलेला अंबरनाथमध्ये दफन करण्याची परवानगी दिली आहे. २० तासानंतर त्या महिलेला दफन करण्यात आले. 

या संदर्भात मुस्लीम जमातीचे प्रमुख सलिम चौधरी यांनी सांगितले की अंबरनाथमध्ये आधीच जागा नाही. ही जागा अंबरनाथकरांनाच कमी पडत आहे. त्यामुळे बाहेरील मृतदेह या ठिकाणी दफन करणो शक्य नाही. त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथ