शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बिहार निवडणुकीसाठी आंबेडकरांचे एमआयएमसोबत आघाडीचे संकेत

By राजेश शेगोकार | Updated: September 28, 2020 17:02 IST

Bihar Assembly Election 2020 : बिहार निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देबिहारमध्ये मुस्लीम, मागासवर्गीय आणि आदिवासी मिळून ४० टक्के समाज आहे. मुस्लीम समाजाला त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भावनिक साद घातली आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी रिंगणात उतरणार असून, बिहारचे सामाजिक गणित लक्षात घेता एमआयएमला पुन्हा सोबत घेण्याचे संकेत खुद्द अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच दिले आहेत. आंबेडकरांनी केलेल्या आवाहनामध्ये एमआयएम मैत्रीबाबत स्पष्टता नसली तरी महाराष्ट्रत विधानसभा निवडणुकीत आम्ही सोबत येऊ शकलो नाही व परिणाम काय झाले हे समोर आहे, असे स्पष्ट केल्यामुळे बिहारमध्ये ते एमआयएमसारख्या पक्षाशी आघाडी करण्याची शक्यता व्यक्त होत आहेसोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये एमआयएमसोबत आघाडी करून ‘ओवेसी’ प्रयोग केला;मात्र औरंगाबादची एकमेव जागा वगळता कुठेही यश मिळाले नाही. खुद्द अ‍ॅड. आंबेडकर हे सुद्धा दोन ठिकाणी पराभूत झाले. संख्यात्मकदृष्ट्या या प्रयोगाला यशाची फळे मिळाली नसली तरी या दोन पक्षाच्या आघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची गणिते पूर्णत: बिघडली व वंचितचे उपद्रव मूल्य अधोरेखित झाले. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून या दोन पक्षात बिनसले अन् दोन्ही पक्षांची मैत्री तुटली. आता बिहार निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत.

जे महाराष्ट्रात घडले नाही ते बिहारमध्ये घडवून आणू. एनडीएच्या सरकारला बिहारमध्ये पराभूत करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. बिहारमध्ये मुस्लीम, मागासवर्गीय आणि आदिवासी मिळून ४० टक्के समाज आहे. यांची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न असून, त्या करिता मुस्लीम समाजाला त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भावनिक साद घातली आहे. या सादेला कसा प्रतिसाद मिळतो, यावरच आंबेडकरांच्या बिहार निवडणुकीच्या प्रयोगाचे भवितव्य ठरणार आहे. त्यांनी यापूर्वी तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश येथेही पक्षाचे उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये तामिळनाडूमध्ये एक आमदार विजयी झाले होते, हे विशेष. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व एमआयएमच्या मैत्रीचा थांबलेला प्रवास बिहार निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020