शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत !

By admin | Updated: January 14, 2017 00:48 IST

सुधारणांसाठी संधी; अकोला मनपाच्या सर्वच जागा लढण्याची तयारी.

अकोला, दि. १३- महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी करण्याचा भारिप-बहुजन महासंघाचा अद्याप निर्णय झाला नसून, महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या नावावर भारिप-बमसं स्वबळावर अकोला महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे, असे संकेत भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिले. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहर सुधारणांसाठी मतदारांना संधी उपलब्ध झाल्याचे सांगत, या निवडणुकीत सर्वच जागा लढण्याची पक्षाची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यासाठी अकोल्यात आले असता, ह्यलोकमतह्णसोबत ते बोलत होते. मनपा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती-आघाडी करण्याचा निर्णय भारिप-बमसंने अद्याप घेतला नाही. त्यामुळे कोणाशीही युती व आघाडी न करता मनपाच्या सर्वच जागा स्वबळावर लढण्याची पक्षाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला शहरात मूलभूत सोयी-सुविधांच्या दृष्टीने सुधारणा झाल्या पाहिजे, असे मतदारांना वाटत असेल, तर मनपा निवडणुकीच्या माध्यमातून शहरातील मतदारांना ही संधी आली आहे. शहर विकासाच्या दृष्टीने शहरातील मतदारांनी या निवडणुकीत निर्णय घेतला पाहिजे, असे अँड. आंबेडकर यांनी सांगितले.वॉर्डा-वॉर्डातून कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या उमेदवारांना प्राधान्य!मनपा निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाची उमेदवारी देताना, शहरातील वॉर्डा-वॉर्डातून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या इच्छुक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामध्ये संबंधित इच्छुक उमेदवारांच्या कार्याची पडताळणी केल्यानंतरच उमेदवारी निश्‍चित करण्यात येणार असल्याचे अँड.आंबेडकर यांनी स्पष्ट केले.उपसमिती करणार उमेदवारांची निवड !मनपा निवडणुकीसाठी भारिप-बमसंने निवडणूक निरीक्षक उपसमिती गठित करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारुन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची निवड या उपसमितीकडून करण्यात येणार असल्याचेही अँड.आंबेडकर यांनी सांगितले.कार्यकर्ता जगला पाहिजे; युती-आघाडी नकोच !पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता जगला पाहिजे, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची युती किंवा आघाडी नसावीच, असे मत अँड.आंबेडकर यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती -आघाडी न केल्यास पक्षातील कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त न्याय देणे शक्य होते, अशी आपली भूमिका असून, पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता जगणे महत्त्वाचे आहे, असेही अँड.आंबेडकरांनी सांगितले.