शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या राजकारणात अखेर अंबादास दानवेंचा उदय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 11:11 IST

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शब्द औरंगाबादच्या राजकारणात मागील कित्येक वर्षांपासून प्रमाण मानला जायचा. परंतु, त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे अपसुकच अंबादास दानवे यांचे महत्त्व वाढणार आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत तब्बल चार वेळा निवडून आलेल्या चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादमधून पराभव झाल्यामुळे मराठवाड्यातून शिवसेनेची पिछेहाट तर सुरू झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. परंतु, अशा परिस्थितीत शिवसेनेचे दुसऱ्या फळीतील नेते अंबादास दानवे यांनी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विजय मिळाला. या विजयामुळे अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर दानवे यांचा अखेर औरंगाबादच्या राजकारणात उदय झाला.

मागील कित्येक वर्षांपासून औरंगाबादच्या राजकारणात स्थिरावू पाहणाऱ्या अंबादास दानवे यांच्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. तोही अशा वेळी जेव्हा जिल्ह्यातील मातब्बर नेते चंद्रकांत खैरे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहे. दानवे यांच्या विजयासाठी युतीने पूर्ण सहकार्य केले. त्यामुळे दानवे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला.

औरंगाबाद-जालना विधान परिषद जागेसाठीच्या निवडणुकीत काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांचा पराभव झाला. गेल्यावेळी काँग्रेसकडे असलेली ही जागा शिवसेनेने परत आपल्याकडे खेचून आणली. वास्तविक पाहता औरंगाबाद आणि जालना जिल्हा परिषदेत शिवसेनेची काँग्रेस युती होती. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रोष होता. अशा स्थितीत दानवे यांच्यासोबत दगाफटका होण्याची शक्यता होती. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून व्हीप जारी केल्यामुळे भाजपची मते दानवे यांनाच मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात खैरे यांचा एकहाती अंमल होता. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांना राज्य पातळीवर चमकण्यासाठी फारशी संधी मिळाली नाही. मात्र खैरे यांच्याविषयी असलेली नाराजी आणि त्यांचा झालेला पराभव यामुळे शिवसेना नेतृत्वाने औरंगाबादमधून नव्या चेहऱ्याला संधी दिली. केवळ संधी न देता दानवे यांच्या विजयासाठी युतीची ताकद उभी केली. तर शिवसेनेचा कायम विरोध करणाऱ्या एमआयएमने देखील दानवे यांना मदत केली. यावरून दानवे यांचे सर्वच पक्षांसोबत असलेले संबंध मैत्रीपूर्ण असल्याचे स्पष्ट होते.

खैरेंची जागा घेणार

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शब्द औरंगाबादच्या राजकारणात मागील कित्येक वर्षांपासून प्रमाण मानला जायचा. परंतु, त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे अपसुकच अंबादास दानवे यांचे महत्त्व वाढणार आहे. त्यातच मराठा समाजातील असल्यामुळे दानवे यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. एकूणच औरंगाबादममध्ये खैरे यांच्यानंतर दानवेंकडे शिवसेनेचे नेतृत्व म्हणून पाहिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.