शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

अंबानी, पारेख यांचा मोदींवर हल्लाबोल!

By admin | Updated: February 19, 2015 03:01 IST

जागतिक अर्थकारणातील घडामोडींचा फायदा मोदी सरकारला होत असून, त्या दृष्टीने ते निश्चित भाग्यवान आहेत. पण गेल्या नऊ महिन्यांत उद्योगाला गती देईल, असे काहीच घडले नाही.

उद्योगांतील अस्वस्थता : आशावादी आहोत, पण परिस्थिती ‘जैसे थे’... मुंबई : जागतिक अर्थकारणातील घडामोडींचा फायदा मोदी सरकारला होत असून, त्या दृष्टीने ते निश्चित भाग्यवान आहेत. पण गेल्या नऊ महिन्यांत उद्योगाला गती देईल, असे काहीच घडले नाही. उद्योग क्षेत्रात याबाबत अस्वस्थता वाढत आहे, असे थेट टीकास्त्र एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी सोडले आहे. दुसरीकडे ज्येष्ठ उद्योगपती अनिल अंबानी यांनीही ‘लालफितीच्या कारभारासंदर्भात बंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पाच्या तोंडावर पारेख व अंबानी अशा देशाच्या अर्थकारणातील प्रमुख चेहरे असलेल्या ज्येष्ठ उद्योगपतींनी अर्थनीतीवर हल्लाबोल केल्याने आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत पारेख यांनी सरकारच्या आर्थिक सुधारणा व अजेंड्याबाबत उद्योगांमध्ये आशावाद असला, तरी सरत्या नऊ महिन्यांत हा आशावाद कंपन्यांच्या कामगिरीतून आणि महसुलाच्या रूपातून प्रतिबिंबित होत नसल्याची भावना व्यक्त केली. व्यवसाय करण्यातील सुलभेतवर भर असल्याचे मोदी सरकार म्हणत आहे; पण दैनंदिन कामकाजात ही सुलभता जाणवत नाही. प्रशासकीय दिरंगाई सातत्याने अनुभवण्यास येत आहे. यासंदर्भात स्वत:च्या उद्योगाचेच उदाहरण देताना ते म्हणाले, की २० वर्षे भारतात कार्यरत असलेल्या आमच्या समूहाला परदेशी भांडवल उभारणी करण्यासाठी अडथळ््यांची शर्यत पार करावी लागली. परदेशी गुंतवणूक बोर्डाकडून अर्थविषयक मंत्रिगटाकडे प्रस्ताव जाण्यास झालेला विलंब आणि मग त्यावर पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या या समितीकडून मंजुरीची मोहर, यामध्ये बराच वेळ निघून गेला. मुळात तांत्रिक आणि नियमाधीन कामांसाठी पंतप्रधानांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीचा वेळ का खर्च करावा लागतो, प्रक्रियेतील सुलभता नेमकी कधी येणार, असे थेट सवाल पारेख यांनी विचारले.अंबानी म्हणतात...च्बंगलोर येथे झालेल्या एका कार्यक्रमात अनिल अंबानी यांनी देखील याच धर्तीवर सूर लावला. संरक्षण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या अंबानी यांनी प्रक्रियेतील दिरंगाईवर बोट ठेवतानाच उद्योगांच्या संरक्षणाबाबतही टिप्पणी केली. च्कोळसा खाणीसंदर्भात सरकारने नुकत्याच काढलेल्या अधिसूचनेचा हवाला देताना ते म्हणाले, की यामध्ये नोकरशहांना योग्य सुरक्षाकवच देण्यात आले आहे. च्मात्र उद्योगांना सुरक्षा देण्याचा विचार दिसून येत नाही. केंद्रीय दक्षता आयोग, सीबीआय किंवा कॅग या तीन ‘सी’चा ससेमिरा उद्योगांच्या मागे असतो. च्यात बदल होणे गरजेचे असून, यापेक्षा ‘करेज’ आणि ‘कनव्हिक्शन’ या दोन ‘सी’चा अंतर्भाव करण्याकडे सरकारने लक्ष द्यावे. प्रक्रिया गतिमान करण्यावर अधिक भर हवा.प्रक्रियेतील अडथळे दूर होतानाच निर्णय प्रक्रियेतील गती वाढली तरच ‘मेक इन इंडिया’द्वारे व्यवसाय करणे सुलभ होईल.- दीपक पारेखविचार करून घोषणा करा... ‘आप’चे संस्थापक सदस्य शांतीभूषण यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना एखादी घोषणा करताना त्याच्या पूर्ततेसाठी वित्तसाहाय्य कसे उपलब्ध होईल, हे डोक्यात ठेऊन घोषणा करावी, असा सल्ला दिला आहे.