शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

आंबोली धबधब्याच्या नामकरणाच्या हालचाली, धबधबा अडकला सीमावादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 19:42 IST

जगाच्या नकाशावर आलेल्या निसर्ग संपदेनं परिपूर्ण असलेल्या आंबोलीचा धबधबा सीमेच्या वादात अडकला आहे. आंबोली आणि पारपोली या दोन्ही ग्रामपंचायतींनी आंबोली धबधब्यावर दावा केला आहे.

सावंतवाडी, दि. 13 - जगाच्या नकाशावर आलेल्या निसर्ग संपदेनं परिपूर्ण असलेल्या आंबोलीचा धबधबा सीमेच्या वादात अडकला आहे. आंबोली आणि पारपोली या दोन्ही ग्रामपंचायतींनी आंबोली धबधब्यावर दावा केला आहे. आंबोली हा धबधबा पारपोली गावाच्या हद्दीत येत असल्यानं त्याच्या नामकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. आंबोलीच्या नामकरणासाठी पारपोलीवासीय आणि वनविभागामध्ये गुप्त बैठकाही सुरू आहेत. आंबोलीचं नामकरण करण्याला आंबोलीवासीयांचा विरोध आहे. आंबोली घाट व वर्षा पर्यटनाला मुख्य आंबोलीच्या धबधब्यामुळे वरदान लाभलं आहे. या धबधब्यावर दिवसाकाठी हजारो पर्यटक येतात; निसर्ग संपदेनं तृप्त असलेला हा धबधबा सीमेच्या वादात फसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीचा विकास व्हावा, यासाठी आंबोली धबधब्याला भेट देणार्‍या पर्यटकांकडून प्रत्येकी 10 रुपये पर्यटन कर आकारण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्यात आली. आतापर्यंत वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून समितीकडे दहा लाखांहून अधिकची रक्कम कराच्या स्वरुपात गोळा झालेली आहे. येत्या काळात या रकमेत वाढ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.कराच्या माध्यमातून मिळणारे लाखो रुपये हाच कळीचा मुद्दा ठरला असून, पारपोली ग्रामपंचायतीला धबधब्याचं नामकरण करायचं आहे. पर्यटनातून मिळणा-या कराच्या उत्पन्नावर आता पारपोली आणि आंबोली या दोन्ही ग्रामपंचायतींचा डोळा आहे. त्यामुळे ते उत्पन्न आपल्यालाच मिळावे, यासाठी दोन्ही ग्रामपंचायती प्रयत्नशील आहेत. वनविभाग आणि महसूल विभागाने कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार आंबोली धबधबा हा पारपोली गावच्या हद्दीत येत असल्यामुळे त्याची देखरेख आणि मिळणारे उत्पन्न आमच्या ग्रामपंचायतीला देण्यात यावे, अशी मागणी पारपोली ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. आंबोली धबधब्याचे नामकरण ‘शिवमुख धबधबा पारपोली’ असे करण्याचाही पारपोली ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. त्यासाठी ग्रामस्थ आणि वनविभागाच्या गोपनीय बैठका होतायत.आचारसंहितेमुळे त्यांना उघड कोणतीही भूमिका घेता येत नाही. नामकरणाला आंबोली आणि चौकुळ ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच इतकी वर्षे हा आंबोली धबधबा या नावानेच ओळखला जात असल्यामुळे काहीही झाले तरी आम्ही त्याचे नाव बदलण्यास देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलीय. मात्र दोन गावांत वाद लावण्यासाठी वन विभागाचे अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोपही आंबोली चौकूळ ग्रामस्थांनी केला आहे. विद्यमान उपसरपंच धबधब्याच्या ठिकाणी करवसुली करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकात बसतात ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे असा प्रकार करू शकत नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.