शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

पाणीवाटपामध्ये दौैंडवर कायमच अन्याय

By admin | Updated: March 6, 2017 01:26 IST

धरणातील पाण्याचा हक्क हा प्रथम दौंडकरांचा आहे.

वरवंड : दौंड तालुक्यामध्ये सर्वांत जास्त पुनर्वसन झाले आहे. यामुळे धरणातील पाण्याचा हक्क हा प्रथम दौंडकरांचा आहे. मात्र, पाणीवाटपामध्ये ग्रामीण भागावर नेहमीच अन्याय का होतो, असा सवाल दौैंडमधील शेतकऱ्यांनी केला.वरवंड येथे पाणी नियोजन बैठक आयोजित केली होती. यात उपस्थितांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.खडकवासला धरणातून मिळणाऱ्या हक्काच्या पाण्यासाठी वारंवार झगडावे लागत आहे. साखळी पद्धतीने पाणी मिळत असते. मात्र, हे पाणी सहजासहजी मिळणे आता शक्य राहिलेले नाही. कारण वारंवार या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे.बैैठकीत भीमा पाटसचे माजी संचालक महेश भागवत बोलताना म्हणाले, की फेब्रुवारीनंतर पाण्याची चर्चा सुरू होते. खडकवासल्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्याशिवाय पाणी मिळणे शक्य नाही. मात्र, पाणीवाटपामध्ये ग्रामीण भागावर अन्याय का होत आहे? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुण्याची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे, त्यांनी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र, यामुळे आपले पाणी कमी होत आहे. पुणे शहराला मुळशी धरणातून पाणी उपलब्ध होऊ शकते. खडकवासल्याचे पाणी आपल्या हक्काचे आहे.भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर म्हणाले, की पाणी हे जीवन आहे. आंदोलन करण्यात आमचे आयुष्य गेले आहे. त्या पाण्यावर ग्रामीण भागातील जनतेचा अधिकार आहे. याबाबत न्यायासाठी जलआयोग व न्यायालयात आपल्याला जावे लागणार आहे.या वेळी सत्वशील शितोळे, अशोक फरगडे, किशोर दिवेकर, लक्ष्मण दिवेकर, राजेंद्र देशमुख, विठ्ठल दिवेकर, केशव दिवेकर, दत्तात्रय दिवेकर, योगिनी दिवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी शेतकरी अंकुश दिवेकर, वाल्मीक सातपुते, मनोहर सातपुते, संदीप दिवेकर, सतीश राऊत, सरपंच संजय खडके, उपसरपंच नाना शेळके, शिवाजी शेलार, दिलीप दिवेकर, बापू बारवकर व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)