शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

पाणीवाटपामध्ये दौैंडवर कायमच अन्याय

By admin | Updated: March 6, 2017 01:26 IST

धरणातील पाण्याचा हक्क हा प्रथम दौंडकरांचा आहे.

वरवंड : दौंड तालुक्यामध्ये सर्वांत जास्त पुनर्वसन झाले आहे. यामुळे धरणातील पाण्याचा हक्क हा प्रथम दौंडकरांचा आहे. मात्र, पाणीवाटपामध्ये ग्रामीण भागावर नेहमीच अन्याय का होतो, असा सवाल दौैंडमधील शेतकऱ्यांनी केला.वरवंड येथे पाणी नियोजन बैठक आयोजित केली होती. यात उपस्थितांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.खडकवासला धरणातून मिळणाऱ्या हक्काच्या पाण्यासाठी वारंवार झगडावे लागत आहे. साखळी पद्धतीने पाणी मिळत असते. मात्र, हे पाणी सहजासहजी मिळणे आता शक्य राहिलेले नाही. कारण वारंवार या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे.बैैठकीत भीमा पाटसचे माजी संचालक महेश भागवत बोलताना म्हणाले, की फेब्रुवारीनंतर पाण्याची चर्चा सुरू होते. खडकवासल्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्याशिवाय पाणी मिळणे शक्य नाही. मात्र, पाणीवाटपामध्ये ग्रामीण भागावर अन्याय का होत आहे? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुण्याची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे, त्यांनी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र, यामुळे आपले पाणी कमी होत आहे. पुणे शहराला मुळशी धरणातून पाणी उपलब्ध होऊ शकते. खडकवासल्याचे पाणी आपल्या हक्काचे आहे.भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर म्हणाले, की पाणी हे जीवन आहे. आंदोलन करण्यात आमचे आयुष्य गेले आहे. त्या पाण्यावर ग्रामीण भागातील जनतेचा अधिकार आहे. याबाबत न्यायासाठी जलआयोग व न्यायालयात आपल्याला जावे लागणार आहे.या वेळी सत्वशील शितोळे, अशोक फरगडे, किशोर दिवेकर, लक्ष्मण दिवेकर, राजेंद्र देशमुख, विठ्ठल दिवेकर, केशव दिवेकर, दत्तात्रय दिवेकर, योगिनी दिवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी शेतकरी अंकुश दिवेकर, वाल्मीक सातपुते, मनोहर सातपुते, संदीप दिवेकर, सतीश राऊत, सरपंच संजय खडके, उपसरपंच नाना शेळके, शिवाजी शेलार, दिलीप दिवेकर, बापू बारवकर व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)