शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

वेतन दिले तरी ४० कोटी अडविले

By admin | Updated: July 14, 2017 03:34 IST

तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चारच्या व्यवस्थापनाने केलेल्या विनंती नुसार कंत्राटदारानी कंत्राटी कामगरांना किमान वेतनानुसार पगार दिला

पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चारच्या व्यवस्थापनाने केलेल्या विनंती नुसार कंत्राटदारानी कंत्राटी कामगरांना किमान वेतनानुसार पगार दिला. मात्र त्यासाठी एनपीआयसीएल ने रोखून ठेवलेले ४० कोटींचे बिल तातडी न दिल्यास या कामगारांचे पुढील वेतन रोखण्याचा निर्णय तारापूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ने घेतला आहे. तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चार व भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) या दोन्ही प्रकल्पात व कर्मचारी वसाहतीमध्ये २०१४ सालापासून सुमारे अडीच ते तीन हजार पुरुष व महिला कंत्राटी कामगार काम करीत होते. या कामगारांच्या किमान वेतनात १५० रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्याबाबतचे गॅझेट उशिरा प्राप्त झाले. त्यामुळे ते तत्काळ देता आले नाही. १० सप्टेंबर २०१४ रोजी तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चारच्या व्यवस्थापनाने (एन पी सी आय एल) नोटीस काढून कामगारांना सहा महिन्याच्या काळातील अतिरिक्त वाढीव रक्कम देण्याचे कंत्राटदारांना आदेश दिले.या नुसार कंत्राटी कामगारांना वाढीव रक्कम देण्यात ही आली मात्र कंत्राटदारांच्या अकाउंटमध्ये त्या रक्कमेची नोंद ‘अ‍ॅडव्हान्स’ म्हणून करण्यात आली ही रक्कम दिवसेंदिवस वाढत गेल्याने ती देण्यास कंत्राटदारांनी असमर्थता दखविल्यानंतर काहींचे कॉन्ट्रॅक्टच बंद करण्यात आले तर अनेकांचे कामगार कमी केले. एनपीसीआयएल व्यवस्थापन अतिरिक्त रक्कम बाबत योग्य निर्णय घेत नसल्याने तारापूर अणुऊर्जा केंद्रातील कंत्राटदार एकत्र येवून तारापूर काँटॅ्रक्टर असोसिएशनची स्थापना करून मुंबई सायन येथील केंद्रीय श्रम विभागाच्या असिस्टंट लेबर कमिशनर यांचे दरवाजे ठोठवाले त्यांनीही वाढीव रक्कम देण्याची जबाबदारी ही प्रिन्सीपलची असल्याचे मत व्यक्त केले आहे. ही ४० कोटींची बिले तातडीने दिली नाही व किमान वेतनाची फरकाची रक्कम दिली नाही तर कंत्राटींचे पुढील वेतन रोखण्याचा इशारा असोसिएशने दिला आहे.कंत्राटदार म्हणतात ...तर आत्महत्या करावी लागेल !मात्र त्या नंतरही कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनामध्ये झालेल्या वृद्धीच्या पोटी अतिरिक्त रक्कम देण्याबाबत तारापूर अणुऊर्जा केंद्र व्यवस्थापनााने ठोस निर्णय घेतला तर नाहीच उलट शंभर ठेकेदारांच्या साडेचारशे बिलांच्या सुमारे ४० कोटीची बिल रोखून ठेवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आली तशी आत्महत्या करण्याची पाळी आमच्यावर येईल असे कंत्राटदारानी सांगून कंत्राटी कामगारांना बोनसची रक्कम दिल्याचे व अन्य तांत्रिक मुद्दे उपस्थित करून अ‍ॅडव्हान्सची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप एनपीसीआयएलवर केला आह.