शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

वेतन दिले तरी ४० कोटी अडविले

By admin | Updated: July 14, 2017 03:34 IST

तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चारच्या व्यवस्थापनाने केलेल्या विनंती नुसार कंत्राटदारानी कंत्राटी कामगरांना किमान वेतनानुसार पगार दिला

पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चारच्या व्यवस्थापनाने केलेल्या विनंती नुसार कंत्राटदारानी कंत्राटी कामगरांना किमान वेतनानुसार पगार दिला. मात्र त्यासाठी एनपीआयसीएल ने रोखून ठेवलेले ४० कोटींचे बिल तातडी न दिल्यास या कामगारांचे पुढील वेतन रोखण्याचा निर्णय तारापूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ने घेतला आहे. तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चार व भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) या दोन्ही प्रकल्पात व कर्मचारी वसाहतीमध्ये २०१४ सालापासून सुमारे अडीच ते तीन हजार पुरुष व महिला कंत्राटी कामगार काम करीत होते. या कामगारांच्या किमान वेतनात १५० रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्याबाबतचे गॅझेट उशिरा प्राप्त झाले. त्यामुळे ते तत्काळ देता आले नाही. १० सप्टेंबर २०१४ रोजी तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चारच्या व्यवस्थापनाने (एन पी सी आय एल) नोटीस काढून कामगारांना सहा महिन्याच्या काळातील अतिरिक्त वाढीव रक्कम देण्याचे कंत्राटदारांना आदेश दिले.या नुसार कंत्राटी कामगारांना वाढीव रक्कम देण्यात ही आली मात्र कंत्राटदारांच्या अकाउंटमध्ये त्या रक्कमेची नोंद ‘अ‍ॅडव्हान्स’ म्हणून करण्यात आली ही रक्कम दिवसेंदिवस वाढत गेल्याने ती देण्यास कंत्राटदारांनी असमर्थता दखविल्यानंतर काहींचे कॉन्ट्रॅक्टच बंद करण्यात आले तर अनेकांचे कामगार कमी केले. एनपीसीआयएल व्यवस्थापन अतिरिक्त रक्कम बाबत योग्य निर्णय घेत नसल्याने तारापूर अणुऊर्जा केंद्रातील कंत्राटदार एकत्र येवून तारापूर काँटॅ्रक्टर असोसिएशनची स्थापना करून मुंबई सायन येथील केंद्रीय श्रम विभागाच्या असिस्टंट लेबर कमिशनर यांचे दरवाजे ठोठवाले त्यांनीही वाढीव रक्कम देण्याची जबाबदारी ही प्रिन्सीपलची असल्याचे मत व्यक्त केले आहे. ही ४० कोटींची बिले तातडीने दिली नाही व किमान वेतनाची फरकाची रक्कम दिली नाही तर कंत्राटींचे पुढील वेतन रोखण्याचा इशारा असोसिएशने दिला आहे.कंत्राटदार म्हणतात ...तर आत्महत्या करावी लागेल !मात्र त्या नंतरही कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनामध्ये झालेल्या वृद्धीच्या पोटी अतिरिक्त रक्कम देण्याबाबत तारापूर अणुऊर्जा केंद्र व्यवस्थापनााने ठोस निर्णय घेतला तर नाहीच उलट शंभर ठेकेदारांच्या साडेचारशे बिलांच्या सुमारे ४० कोटीची बिल रोखून ठेवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आली तशी आत्महत्या करण्याची पाळी आमच्यावर येईल असे कंत्राटदारानी सांगून कंत्राटी कामगारांना बोनसची रक्कम दिल्याचे व अन्य तांत्रिक मुद्दे उपस्थित करून अ‍ॅडव्हान्सची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप एनपीसीआयएलवर केला आह.