शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

'थापा'ला पर्यायी शब्द म्हणजे भाजपा - राज ठाकरेंचा घणाघात

By admin | Updated: October 9, 2015 20:35 IST

आता कुठे गेले अच्छे दिन असा सवाल उपस्थित करत हल्ली 'थापा'ला पर्याय शब्द म्हणून भाजपाचा वापर केला जातो अशी घणाघाती टीका करत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

ऑनलाइन लोकमत

डोंबिवली, दि. ९ - १०० दिवसांत अच्छे दिन आणू असे आश्वासन भाजपाने दिले, पण आता कुठे गेले अच्छे दिन असा सवाल उपस्थित करत हल्ली 'थापा'ला पर्याय शब्द म्हणून भाजपाचा वापर केला जातो अशी घणाघाती टीका करत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. 

शुक्रवारी राज ठाकरे यांनी कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी नरेंद्र मोदी, भाजपावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेंडीची भाजी आहे असे सांगत राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्रींची खिल्ली उडवली. निवडणूक तोंडावर येताच पॅकेज वाटतात, पण मग वर्षभरापूर्वीच का पॅकेज जाहीर केले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपाला उमेदवार मिळत नसल्याने ते आशेपोटी दुस-या पक्षांकडे बघतात, विधानसभेपाठोपाठ कल्याण डोंबिवलीतही भाजपाने तेच केले असून नशीब बराक ओबामांकडे भाजपाने उमेदवार मागितले नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवसेना - भाजपा हे फक्त टेंडरपुरते एकत्र आले असून कल्याण डोंबिवलीची धूळधाण त्यांनी केली आहे असे टीकास्त्रही त्यांनी सोडले आहे. शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते जातीपातीचे राजकारण करत आहे. शरद पवारांना फडवणवीस नको होते तर त्यांनी मोदींना सांगायला पाहिजे होते असेही राज ठाकरेंनी नमूद केले. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याऐवजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करा असेही त्यांनी म्हटले आहे.