शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात पोषण आहार वितरणासाठी लवकरच पर्यायी व्यवस्था; अंगणवाड्या बंद असल्याने कुपोषणात वाढ होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 15:47 IST

राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सोमवारपासून पुकारलेल्या संपामुळे अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना केला जाणारा पोषण आहाराचा पुरवठा बंद झाला आहे.

ठळक मुद्दे राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सोमवारपासून पुकारलेल्या संपामुळे अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना केला जाणारा पोषण आहाराचा पुरवठा बंद झाला आहे. माता-बालमृत्यू आणि कुपोषणाचा सामना करणाऱ्या मेळघाटसारख्या आदिवासीबहुल भागात पोषण आहार बंदमुळे कुपोषणात वाढ होण्याची शक्यतापोषण आहार पुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यपातळीवर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून लवकरच या समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो. 

परतवाडा, दि. 13- राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सोमवारपासून पुकारलेल्या संपामुळे अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना केला जाणारा पोषण आहाराचा पुरवठा बंद झाला आहे. परंतु माता-बालमृत्यू आणि कुपोषणाचा सामना करणाऱ्या मेळघाटसारख्या आदिवासीबहुल भागात पोषण आहार बंदमुळे कुपोषणात वाढ होण्याची शक्यता असल्याने पोषण आहार पुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यपातळीवर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून लवकरच या समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो. 

राज्यात सोमवारपासून अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा राज्यव्यापी संप सुरू झाल्यापासून म्हणजे मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यासह विशेषत: मेळघाटात २० हजारांवर आदिवासी मुले व स्तनदा आणि गर्भवती मातांना दररोज दिला जाणारा पोषण आहार बंद झाला आहे. पूरक पोषण आहाराअभावी बालकांच्या कुपोषणात वाढ होण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मेळघाटाची परिस्थिती वेगळी आहे. येथे पोषण आहार वितरण बंद राहिल्यास कुपोषणमुक्तीच्या प्रयत्नांमध्ये अडसर येऊ शकतो. कुपोषणात वाढ होऊन कुपोषित मुले कुपोषणाच्या तिस-या व चौथ्या श्रेणीत जाऊ शकते. ही शक्यता लक्षात घेता, मेळघाटाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी राज्यशासनासह जिल्हा प्रशासनाला विशेष दखल घेण्याची गरज आहे.

जिल्हास्तरावरही चर्चा अंगणवाडीतील सेवा या माता आणि बालकांच्या आहार आणि आरोग्याशी संबंधित असल्याने त्या अत्यावश्यक सेवेत मोडतात. त्यामुळे यासेवा पुरविणे अंगणवाडी सेविका मदतनिसांवर बंधनकारक आहे. म्हणूनच राज्य पातळीवर याबाबत सकारात्मक पावले उचलली जात असून याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. तर जिल्हा पातळीवरील संघटनेच्या नेत्यांशी पण चर्चा केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे महिला व  बाल कल्याण अधिकारी कैलास घोडके यांनी लोकमतशी बोलताना दिली. विशेषत: मेळघाटातील  अंगणवाडी सेविका व मदतनीसांसोबत सुद्धा चर्चा सुरू आहे. मेळघाटातील बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहार आणि आरोग्याची अत्यावश्यक बाब म्हणून सेवा देण्यास तयार असल्याची माहिती आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविकांच्या सतत संपर्कात आहेत. येत्या एक दोन दिवसात जिल्ह्यातील प्रश्न मिटला नाही तरी मेळघाटात पूर्ववत आहार वितरण सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.      

पोषण आहाराबाबत मेळघाटचा प्रश्न गंभीर आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संघटनेसोबत बोलणी सुरु आहे. लवकरच बालकांना व गर्भवती आणि स्तनदा मातांना पूर्ववत पोषण आहार पुरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.-कैलास घोडके, उपमुख्य कार्यपालन अधिकारी, महिला, बालकल्याण विभाग, अमरावती