शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आधीच आॅक्टोबर हीट, त्यात वीज गूल; भारनियमन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 04:14 IST

आॅक्टोबर हिटमुळे वाढलेली विजेची मागणी, कोळशाचा तुटवडा आणि पाण्याची पातळी खालावल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पावर आलेली बंधने यामुळे वीजनिर्मिती आणि मागणीमध्ये पाच हजार मेगावॅटचा फरक पडला आहे.

रत्नागिरी : आॅक्टोबर हिटमुळे वाढलेली विजेची मागणी, कोळशाचा तुटवडा आणि पाण्याची पातळी खालावल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पावर आलेली बंधने यामुळे वीजनिर्मिती आणि मागणीमध्ये पाच हजार मेगावॅटचा फरक पडला आहे. त्यामुळे सोमवारपासून काही ठिकाणी भारनियमनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने भारनियमनाचा प्रश्न इथूनपुढे आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.राज्यात सोमवारी १९ हजार ९९६ मेगावॅट विजेची मागणी होती. महावितरणकडून १४ हजार ८७० मेगावॅट विजेची उपलब्धता करण्यात आली. आॅक्टोबर हिटमुळे घरगुती, वाणिज्यिक त्याचबरोबर शेतीपंपांसाठीही विजेची मागणी वाढली आहे. पिके वाळण्याची भीती असल्यामुळे कृषीपंपाचा सर्वाधिक वापर होत आहे.राज्यातील औष्णिक प्रकल्पातंर्गत ५ हजार २३९ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातंर्गत १४०० मेगावॅट वीजनिर्मिती होते. केंद्रीय प्रकल्पातंर्गत ४ हजार ४५० मेगावॅट, सौर उर्जेतंर्गत ४११ मेगावॅट विजेची उपलब्धता होत आहे. अदानी कंपनीकडून २३३५ मेगावॅट, पवन उर्जेतून २७८ मेगावॅट, याशिवाय जिंदाल प्रकल्पातून २८७ मेगावॅट, रतन इंडिया प्रकल्पातून २७० मेगावॅट मिळून एकूण १४ हजार ८७० मेगावॅट विज निर्मिती होत असून तसा पुरवठा करण्यात येत आहे. मुंबईसाठी ३ हजार ३३० मेगावॅट विजेची मागणी असून त्यासाठी मुंबईतील निर्मिती केंद्रातूनच पुरवठा होत आहे.राज्यातील औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा भासत असल्याने विजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. याशिवाय पाण्याची पातळी खालावल्याने जलविद्युत प्रकल्पातून विजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. त्यामुळे सोमवारी भारनियमन करण्यात आले. महावितरण खुल्या बाजारातून वीज खरेदी करून पुरवठा करीत आहे.- पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, प्रकाशगड, मुंबई.

टॅग्स :mahavitaranमहावितरण