शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आत्महत्येची परवानगी द्या, नाहीतर नक्षलवादी बनतो : शेतकरी पुत्राचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 16:42 IST

Farmer's son's letter to CM वैभव बाबाराव मानखैर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता; मात्र त्याला कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नाही.जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांशीही पत्र व्यवहार केला, पण त्याची दखल घेण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर:   तालुक्यातील एका शेतकरी पुत्राने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. आत्महत्या करण्यास परवानगी देत नसाल, तर उत्कृष्ट नक्षलवादी बनून दाखविणार असल्याचा सूचक इशारा पत्रातून दिल्याने संग्रामपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. काकोडा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा पूत्र वैभव बाबाराव मानखैर याने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमुद आहे की, त्याने संग्रामपूर येथील महाराष्ट्र बँक शाखेत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता; मात्र त्याला कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नाही. शिक्षणासाठी कर्ज मिळावे, या आशेवर त्याने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार केले. अकोला येथील बँकेच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांकडेही त्याने मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांशीही पत्र व्यवहार केला, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. शैक्षणिक कजार्साठी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र बँक शाखा संग्रामपूरकडे केला असता बँक प्रशासनाने अर्ज नामंजूर करीत १२ वी ला ५९.२३ टक्के गूण असल्याने शैक्षणिक कर्ज देता येणार नसल्याचे कारण दिले. त्याने बारावीनंतर मेहनत घेऊन सीईटीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला चांगले गुण मिळाल्याने शासनाच्या कोट्यातून बी-फार्मला प्रवेश मिळणार होता. भविष्यात शैक्षणिक कर्ज घेऊन पुढील शिक्षण करण्याच्या हेतूने त्याने डी-फार्मला प्रवेश घेतला.  गत चार महिन्यांपासून महाराष्ट्र बँक शाखा संग्रामपूरकडे सतत पाठपुरावा करीत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली; मात्र शेतकरी पुत्राच्या हाती शेवटी निराशाच लागली. त्यामुळे त्याने प्रशासकीय यंत्रणेला वैतागून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आत्महत्या करण्यास परवानगी मागितली, अन्यथा नक्षलवादी बनण्याचा इशारा दिला. यामुळे खळबळ उडाली आहे. 

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली खंत व्यक्तकेवळ शेतकरी पुत्र असल्याने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची खंत वैभवन ने पत्रातून  व्यक्त केली. शासनस्तरावरून दहा दिवसात उत्तर न मिळाल्यास उत्कृष्ट नक्षलवादी बनून दाखविण्याचा इशाराही पत्रामधून दिला आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरbuldhanaबुलडाणाUddhav Thackerayउद्धव ठाकरे