शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

आत्महत्येची परवानगी द्या, नाहीतर नक्षलवादी बनतो : शेतकरी पुत्राचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 16:42 IST

Farmer's son's letter to CM वैभव बाबाराव मानखैर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता; मात्र त्याला कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नाही.जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांशीही पत्र व्यवहार केला, पण त्याची दखल घेण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर:   तालुक्यातील एका शेतकरी पुत्राने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. आत्महत्या करण्यास परवानगी देत नसाल, तर उत्कृष्ट नक्षलवादी बनून दाखविणार असल्याचा सूचक इशारा पत्रातून दिल्याने संग्रामपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. काकोडा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा पूत्र वैभव बाबाराव मानखैर याने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमुद आहे की, त्याने संग्रामपूर येथील महाराष्ट्र बँक शाखेत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता; मात्र त्याला कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नाही. शिक्षणासाठी कर्ज मिळावे, या आशेवर त्याने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार केले. अकोला येथील बँकेच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांकडेही त्याने मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांशीही पत्र व्यवहार केला, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. शैक्षणिक कजार्साठी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र बँक शाखा संग्रामपूरकडे केला असता बँक प्रशासनाने अर्ज नामंजूर करीत १२ वी ला ५९.२३ टक्के गूण असल्याने शैक्षणिक कर्ज देता येणार नसल्याचे कारण दिले. त्याने बारावीनंतर मेहनत घेऊन सीईटीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला चांगले गुण मिळाल्याने शासनाच्या कोट्यातून बी-फार्मला प्रवेश मिळणार होता. भविष्यात शैक्षणिक कर्ज घेऊन पुढील शिक्षण करण्याच्या हेतूने त्याने डी-फार्मला प्रवेश घेतला.  गत चार महिन्यांपासून महाराष्ट्र बँक शाखा संग्रामपूरकडे सतत पाठपुरावा करीत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली; मात्र शेतकरी पुत्राच्या हाती शेवटी निराशाच लागली. त्यामुळे त्याने प्रशासकीय यंत्रणेला वैतागून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आत्महत्या करण्यास परवानगी मागितली, अन्यथा नक्षलवादी बनण्याचा इशारा दिला. यामुळे खळबळ उडाली आहे. 

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली खंत व्यक्तकेवळ शेतकरी पुत्र असल्याने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची खंत वैभवन ने पत्रातून  व्यक्त केली. शासनस्तरावरून दहा दिवसात उत्तर न मिळाल्यास उत्कृष्ट नक्षलवादी बनून दाखविण्याचा इशाराही पत्रामधून दिला आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरbuldhanaबुलडाणाUddhav Thackerayउद्धव ठाकरे