शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:20 IST

मुंबईतील रहिवासी महादू बेलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून इच्छामरणाचा अधिकार देण्याची विनंती केली.

सरकार आमच्या मुलांना वाचवण्यास मदत करू शकत नसेल तर, किमान आम्हाला इच्छामरणाचा अधिकार द्या, अशी विनंती मुंबईतील रहिवासी महादू बेलकर यांनी पत्रातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. महादू बेलकर यांचा १५ वर्षांचा मुलगा तनेश बेलकर हा एसएसपीई या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे तनेशला खूप असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. त्याच्या असह्य वेदना पाहवत नाहीत. तसेच राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने महादू बेलकर यांनी पत्रातून नाराजी व्यक्त केली.

 महादू बेलकर यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "आमच्या मुलाला प्रत्येक मिनिटाला असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. तो हालचाल किंवा बोलू शकत नाही. पालक म्हणून आम्हाला त्याच्या वेदना पाहवत नाहीत. सरकार त्याला वाचवण्यासाठी मदत करू शकत नसेल तर, आम्हाला इच्छामरणाचा अधिकार  द्या."

पुढे महादू बेलकर म्हणाले की, राज्यातील एकूण ६७ जण एसएसपीई या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहेत. तनेश बेलकर हा त्यापैकी एक आहे. काही अधिकाऱ्यांकडून सहानुभूतीच्या शब्दांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. एसएसपीई आजारावर उपचार करण्यासाठी लागणारा खर्च परवडत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. आमची मुले मरत आहेत, परंतु कोणालाही काळजी वाटत नाही.सर्व अधिकारी त्यांच्या स्वतःच्या जगात व्यस्त असल्याचे दिसून येते. आम्हाला कुढत ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी सात वर्षांच्या ओवी पुरीचा मृत्यू झाला. ओवीच्या पालकांनी तिच्या आजारावर ३० लाखांपेक्षा अधिक खर्च केला. परंतु तरीही तिला वाचवू शकले नाहीत."

दरम्यान, २२ वर्षीय एसएसपीई रुग्ण रितिक जैन यांच्या आई मीनाबाई मांगीलाल जैन यांचे २३ जून रोजी निधन झाले. त्यांचे पती मांगीलाल हुकामीचंद जैन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा २०२० पासून एसएसपीई या आजाराने ग्रस्त आहे. मुलाची प्रकृती बिघडत चालली असून कोणीही मदत करत नसल्याच्या तणावातून माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. आता ते आपल्या दोन मुलांसह राहतात. आर्थिक परिस्थिती हलाक्याची असताना त्यांची कशी काळजी घ्यावी? जगण्यापेक्षा मरणे बरे वाटत आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र