शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
5
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
6
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
7
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
8
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
9
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
10
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
11
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
12
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
13
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
14
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
15
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
16
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
17
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
18
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
19
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
20
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:20 IST

मुंबईतील रहिवासी महादू बेलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून इच्छामरणाचा अधिकार देण्याची विनंती केली.

सरकार आमच्या मुलांना वाचवण्यास मदत करू शकत नसेल तर, किमान आम्हाला इच्छामरणाचा अधिकार द्या, अशी विनंती मुंबईतील रहिवासी महादू बेलकर यांनी पत्रातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. महादू बेलकर यांचा १५ वर्षांचा मुलगा तनेश बेलकर हा एसएसपीई या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे तनेशला खूप असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. त्याच्या असह्य वेदना पाहवत नाहीत. तसेच राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने महादू बेलकर यांनी पत्रातून नाराजी व्यक्त केली.

 महादू बेलकर यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "आमच्या मुलाला प्रत्येक मिनिटाला असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. तो हालचाल किंवा बोलू शकत नाही. पालक म्हणून आम्हाला त्याच्या वेदना पाहवत नाहीत. सरकार त्याला वाचवण्यासाठी मदत करू शकत नसेल तर, आम्हाला इच्छामरणाचा अधिकार  द्या."

पुढे महादू बेलकर म्हणाले की, राज्यातील एकूण ६७ जण एसएसपीई या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहेत. तनेश बेलकर हा त्यापैकी एक आहे. काही अधिकाऱ्यांकडून सहानुभूतीच्या शब्दांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. एसएसपीई आजारावर उपचार करण्यासाठी लागणारा खर्च परवडत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. आमची मुले मरत आहेत, परंतु कोणालाही काळजी वाटत नाही.सर्व अधिकारी त्यांच्या स्वतःच्या जगात व्यस्त असल्याचे दिसून येते. आम्हाला कुढत ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी सात वर्षांच्या ओवी पुरीचा मृत्यू झाला. ओवीच्या पालकांनी तिच्या आजारावर ३० लाखांपेक्षा अधिक खर्च केला. परंतु तरीही तिला वाचवू शकले नाहीत."

दरम्यान, २२ वर्षीय एसएसपीई रुग्ण रितिक जैन यांच्या आई मीनाबाई मांगीलाल जैन यांचे २३ जून रोजी निधन झाले. त्यांचे पती मांगीलाल हुकामीचंद जैन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा २०२० पासून एसएसपीई या आजाराने ग्रस्त आहे. मुलाची प्रकृती बिघडत चालली असून कोणीही मदत करत नसल्याच्या तणावातून माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. आता ते आपल्या दोन मुलांसह राहतात. आर्थिक परिस्थिती हलाक्याची असताना त्यांची कशी काळजी घ्यावी? जगण्यापेक्षा मरणे बरे वाटत आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र