शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

यंदाच्या रब्बीसाठी ३२.५० लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन, परतीच्या पावसाने क्षेत्रवाढ अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 16:59 IST

विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात परतीच्या पावसाने सरासरी भरून काढली. त्यामुळे रब्बीची क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रब्बीसाठी ३२ लाख ५० हजार मेट्रिक टन आवंटन मंजूर असल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

अमरावती,  दि. २६ -  विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात परतीच्या पावसाने सरासरी भरून काढली. त्यामुळे रब्बीची क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रब्बीसाठी ३२ लाख ५० हजार मेट्रिक टन आवंटन मंजूर असल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. तसेच खरीप हंगामात पावसाची तूट असल्यामुळे खतांचा साठा शिल्लक होता. त्यामुळे यंदाच्या रब्बीमध्ये खतांचा मुबलक साठा शिल्लक राहणार आहे.राज्यातील मुंबई व उपनगर वगळता ऊर्वरित ३४ जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामासाठी ३२ लाख ५० हजार मे.टन खतांचे आवंटन मंजूर आहे. यामध्ये युरियासाठी सर्वाधिक ११ लाख ५० हजार मे.टनाचा समावेश आहे. डीएपी तीन लाख ५० हजार मे.टन, एमओपी दोन लाख मे.टन, एनपीके नऊ लाख ५० हजार मे.टन  व एसएसपी सहा लाख मेट्रिक टन खतांचा समावेश आहे. यंदाच्या खरिपात जून महिन्यापासून सर्वच जिल्ह्यात पावसाची तूट असल्याने खतांचा उठाव झालाच नाही. त्यामुळेही खतांचा साठा शिल्लक आहे. डिलरकडे ३१ मार्च २०१७ अखेरचा तसेच नॉन बफर स्टॉकमधील साठा आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठीदेखील रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आल्यामुळे खतांची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणे व हंगामात खतांची भाववाढ करून शेतक-यांची अडवणूक करण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. यंदाच्या रब्बीसाठी रासायनिक खतांचे सर्वाधिक दोन लाख ३१ हजार ६०० मे.टनाचे आवंटन अहमदनगर जिल्ह्यासाठी मंजूर आहे, तर सर्वात कमी आवंटन सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या युरियाची टंचाई यंदा भासणार नाही. युरियासाठी सर्वाधिक एक लाख मे.टनचे आवंटन सोलापूर जिल्ह्यासाठी, तर सर्वात कमी चार हजार मेट्रिक टनचे आवंटन ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे.

 जिल्हानिहाय मंजूर खतांचे आवंटनयंदाच्या रब्बीसाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी २,३१,६०० मे.टन, अकोला ५५,२००, अमरावती ९०,९००, औरंगाबाद १,६१,०००, भंडारा ४१,२००, बीड १,०३,६००, बुलडाणा १,३६,५००,चंद्रपूर ४४,९००, धुळे ६८,७००,गडचिरोली २५,७००, गोंदिया ३६,९००, हिंगोली ४०,३००, जळगाव २,२८,७००, जालना १,२४,२००, कोल्हापूर १,८०,६००,लातूर ६४,६००, नागपूर ८४,५००, नंदूरबार ६८,०००, नाशिक १,८९,२००, उस्मानाबाद ३५,२००, पालघर १०,०००,  परभणी ५६,८००,पूणे २,३०,९००, रायगड १०,०००, रत्नागिरी ८२,०००, सांगली १,३१,४००, सातारा १,०६,६००, सिंधुुदुर्ग ४,७००, सोलापूर १,९६,८००, ठाणे १२,२००, वर्धा ७६,५००, वाशिम ४५,९०० तर यवतमाळ जिल्ह्यासाठी १,१९,८०० मे.टन साठा मंजूर करण्यात आला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार