शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या रब्बीसाठी ३२.५० लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन, परतीच्या पावसाने क्षेत्रवाढ अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 16:59 IST

विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात परतीच्या पावसाने सरासरी भरून काढली. त्यामुळे रब्बीची क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रब्बीसाठी ३२ लाख ५० हजार मेट्रिक टन आवंटन मंजूर असल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

अमरावती,  दि. २६ -  विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात परतीच्या पावसाने सरासरी भरून काढली. त्यामुळे रब्बीची क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रब्बीसाठी ३२ लाख ५० हजार मेट्रिक टन आवंटन मंजूर असल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. तसेच खरीप हंगामात पावसाची तूट असल्यामुळे खतांचा साठा शिल्लक होता. त्यामुळे यंदाच्या रब्बीमध्ये खतांचा मुबलक साठा शिल्लक राहणार आहे.राज्यातील मुंबई व उपनगर वगळता ऊर्वरित ३४ जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामासाठी ३२ लाख ५० हजार मे.टन खतांचे आवंटन मंजूर आहे. यामध्ये युरियासाठी सर्वाधिक ११ लाख ५० हजार मे.टनाचा समावेश आहे. डीएपी तीन लाख ५० हजार मे.टन, एमओपी दोन लाख मे.टन, एनपीके नऊ लाख ५० हजार मे.टन  व एसएसपी सहा लाख मेट्रिक टन खतांचा समावेश आहे. यंदाच्या खरिपात जून महिन्यापासून सर्वच जिल्ह्यात पावसाची तूट असल्याने खतांचा उठाव झालाच नाही. त्यामुळेही खतांचा साठा शिल्लक आहे. डिलरकडे ३१ मार्च २०१७ अखेरचा तसेच नॉन बफर स्टॉकमधील साठा आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठीदेखील रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आल्यामुळे खतांची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणे व हंगामात खतांची भाववाढ करून शेतक-यांची अडवणूक करण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. यंदाच्या रब्बीसाठी रासायनिक खतांचे सर्वाधिक दोन लाख ३१ हजार ६०० मे.टनाचे आवंटन अहमदनगर जिल्ह्यासाठी मंजूर आहे, तर सर्वात कमी आवंटन सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या युरियाची टंचाई यंदा भासणार नाही. युरियासाठी सर्वाधिक एक लाख मे.टनचे आवंटन सोलापूर जिल्ह्यासाठी, तर सर्वात कमी चार हजार मेट्रिक टनचे आवंटन ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे.

 जिल्हानिहाय मंजूर खतांचे आवंटनयंदाच्या रब्बीसाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी २,३१,६०० मे.टन, अकोला ५५,२००, अमरावती ९०,९००, औरंगाबाद १,६१,०००, भंडारा ४१,२००, बीड १,०३,६००, बुलडाणा १,३६,५००,चंद्रपूर ४४,९००, धुळे ६८,७००,गडचिरोली २५,७००, गोंदिया ३६,९००, हिंगोली ४०,३००, जळगाव २,२८,७००, जालना १,२४,२००, कोल्हापूर १,८०,६००,लातूर ६४,६००, नागपूर ८४,५००, नंदूरबार ६८,०००, नाशिक १,८९,२००, उस्मानाबाद ३५,२००, पालघर १०,०००,  परभणी ५६,८००,पूणे २,३०,९००, रायगड १०,०००, रत्नागिरी ८२,०००, सांगली १,३१,४००, सातारा १,०६,६००, सिंधुुदुर्ग ४,७००, सोलापूर १,९६,८००, ठाणे १२,२००, वर्धा ७६,५००, वाशिम ४५,९०० तर यवतमाळ जिल्ह्यासाठी १,१९,८०० मे.टन साठा मंजूर करण्यात आला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार