शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

चर्चेतच अडकली युती, आघाडी

By admin | Updated: January 26, 2017 02:30 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ अवघ्या एक दिवसावर आली, तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भारतीय जनता पार्टी यांच्यातील आघाडी व युतीची गाडी चर्चेच्या फेऱ्यांमध्येच अडकली आहे

पुणे : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ अवघ्या एक दिवसावर आली, तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भारतीय जनता पार्टी यांच्यातील आघाडी व युतीची गाडी चर्चेच्या फेऱ्यांमध्येच अडकली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत यावर चारही प्रमुख पक्षांमध्ये काहीही निर्णय झालेला नव्हता. शिवसेनेच्या नेत्यांना प्रतीक्षा आहे मातोश्री वरून येणाऱ्या आदेशाची. त्यामुळे त्यांनी बोलणीच थांबविली आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये शिवसेनेबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे तेही चर्चेच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यावरच समाधान मानत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिले आहेत, असे सांगितले असले, तरी या स्थानिक नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी बरोबर नक्की कशी बोलणी करायची, यावर एकमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी हवी आहे, पण ती स्वत:च्या अटींवर. त्यात थोडीही तडजोड करायला ते तयार नाहीत, त्यामुळे तीही चर्चा थांबल्यात जमा आहे. चर्चेची गाडी अडकण्यामागे निवडणुकीनंतरचे राजकारणही आहे. सत्ता आलीच, तर त्यावर आपलेच वर्चस्व असावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते.प्रचारासाठी १२ दिवसांचा अवधीउमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मागील पूर्ण आठ दिवस या प्रमुख चारही पक्षांनी निव्वळ चर्चेत घालविले आहेत. त्या आधी या पक्षांनी स्वतंत्रपणे सर्व प्रभागांमधील सर्व जागांसाठी आपापल्या पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर, त्यांच्यात आघाडी व युतीच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे आधीच नावे जाहीर होत नसल्यामुळे वैतागलेले इच्छुक उमेदवार आता तर त्रस्तच झाले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर प्रचारासाठी अवघ्या १२ दिवसांचा अवधी दिला आहे. त्यातच उमेदवारी निश्चित होत नसल्यामुळे प्रभागात काहीही करता येत नाही.