शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

आघाडीने राज्याला लुटले

By admin | Updated: October 8, 2014 23:04 IST

मनोहर पर्रीकर : दोडामार्गमधील प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर शरसंधान

कसई दोडामार्ग : महाराष्ट्रात गेली पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांनी सत्तेत राहून जनतेला लुटले आहे. त्यांच्याकडील सर्व मंडळी भ्रष्टाचारी आहे. त्यामुळे या आघाडी सरकारला हद्दपार करण्याची आणि नारायण राणेंना मुंबईत पाठविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोडामार्ग येथे केले. शिवरायांच्या राज्यावर खरे प्रेम असते, तर शिवसेनेने युती तोडली नसती, असा टोला उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता पर्रीकर यांनी लगावला. भाजपाचे कोकण प्रचारप्रमुख व गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रचारसभा दोडामार्ग पिंपळेश्वर हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पर्रीकर बोलत होते. व्यासपीठावर गोवा राज्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उमेदवार राजन तेली, भाजपाचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, विजयकुमार मराठे, यशवंत आठलेकर, रंगनाथ गवस, चेतन चव्हाण, चंद्रशेखर देसाई, रमाकांत जाधव, सभापती महेश गवस, सीमा जंगले, आनंद रेडकर, सुनेत्रा नांगरे, स्मिता आठलेकर, चेतन चव्हाण, गणपत जाधव, प्रवीण गवस आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोहर पर्रीकर म्हणाले, तुमची उपस्थिती ही विजयाची नांदी आहे. महाराष्ट्रात सर्व योजना राबवितात, मात्र, त्या योजना स्वत:च्या स्वार्थापोटी राबवितात. जनतेचा त्यांना काही विचार नाही. विकास आम्हीच केला, आम्हीच करू शकतो असे म्हणतात, मग गोवा राज्याप्रमाणे आजपर्यंत विक ास का झाला नाही? असा सवाल करून विरोधकांचा समाचार घेतला. नरेंद्र मोदींवर टीका करतात. परंतु मोदी हेच खरे राष्ट्रभक्त आहेत. भाजपाला बहुमत मिळणार असल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणूनच या टीका केल्या जात आहेत. सिंधुदुर्गात एखादे टुरिस्ट हॉटेल घालायचे म्हटल्यास राणे सुपुत्र त्यामध्ये भागिदारी मागतात. त्यामुळे जनतेने राणेंनाच लोकसभेतून हद्दपार केले. तशाच पद्धतीने राणेंना आता मुंबईत पाठवा, असे आवाहन पर्रीकर यांनी यावेळी केले. पृथ्वीराज चव्हाण स्वच्छ प्रतिमेची जाहिरात करतात. विकास कामेच केली नसतील, तर सारे काही स्वच्छच राहणार, असा टोलाही लगावला. यावेळी गोव्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, अतुल काळसेकर, राजन तेली, राजेंद्र म्हापसेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितहोते. (वार्ताहर)शिवसेनेवर टीकामित्रपक्ष भाजपावर टीका करतात. अफजल खानाच्या तोफा निवडणुकीत उतरल्या, भाजपकडे नेता नाही, अशी टीका केली जाते. परंतु अफजल खान ज्यांच्या मनात आहे, तोच टीका करत असून जनतेला सर्वज्ञात आहे. तसेच शिवाजी राजे हे सर्वांचेच दैवत असून त्यांचा वारसाहक्क केवळ शिवसैनिकांना दिलेला नाही.