शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

आघाडीने राज्याला लुटले

By admin | Updated: October 8, 2014 23:04 IST

मनोहर पर्रीकर : दोडामार्गमधील प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर शरसंधान

कसई दोडामार्ग : महाराष्ट्रात गेली पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांनी सत्तेत राहून जनतेला लुटले आहे. त्यांच्याकडील सर्व मंडळी भ्रष्टाचारी आहे. त्यामुळे या आघाडी सरकारला हद्दपार करण्याची आणि नारायण राणेंना मुंबईत पाठविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोडामार्ग येथे केले. शिवरायांच्या राज्यावर खरे प्रेम असते, तर शिवसेनेने युती तोडली नसती, असा टोला उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता पर्रीकर यांनी लगावला. भाजपाचे कोकण प्रचारप्रमुख व गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रचारसभा दोडामार्ग पिंपळेश्वर हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पर्रीकर बोलत होते. व्यासपीठावर गोवा राज्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उमेदवार राजन तेली, भाजपाचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, विजयकुमार मराठे, यशवंत आठलेकर, रंगनाथ गवस, चेतन चव्हाण, चंद्रशेखर देसाई, रमाकांत जाधव, सभापती महेश गवस, सीमा जंगले, आनंद रेडकर, सुनेत्रा नांगरे, स्मिता आठलेकर, चेतन चव्हाण, गणपत जाधव, प्रवीण गवस आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोहर पर्रीकर म्हणाले, तुमची उपस्थिती ही विजयाची नांदी आहे. महाराष्ट्रात सर्व योजना राबवितात, मात्र, त्या योजना स्वत:च्या स्वार्थापोटी राबवितात. जनतेचा त्यांना काही विचार नाही. विकास आम्हीच केला, आम्हीच करू शकतो असे म्हणतात, मग गोवा राज्याप्रमाणे आजपर्यंत विक ास का झाला नाही? असा सवाल करून विरोधकांचा समाचार घेतला. नरेंद्र मोदींवर टीका करतात. परंतु मोदी हेच खरे राष्ट्रभक्त आहेत. भाजपाला बहुमत मिळणार असल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणूनच या टीका केल्या जात आहेत. सिंधुदुर्गात एखादे टुरिस्ट हॉटेल घालायचे म्हटल्यास राणे सुपुत्र त्यामध्ये भागिदारी मागतात. त्यामुळे जनतेने राणेंनाच लोकसभेतून हद्दपार केले. तशाच पद्धतीने राणेंना आता मुंबईत पाठवा, असे आवाहन पर्रीकर यांनी यावेळी केले. पृथ्वीराज चव्हाण स्वच्छ प्रतिमेची जाहिरात करतात. विकास कामेच केली नसतील, तर सारे काही स्वच्छच राहणार, असा टोलाही लगावला. यावेळी गोव्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, अतुल काळसेकर, राजन तेली, राजेंद्र म्हापसेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितहोते. (वार्ताहर)शिवसेनेवर टीकामित्रपक्ष भाजपावर टीका करतात. अफजल खानाच्या तोफा निवडणुकीत उतरल्या, भाजपकडे नेता नाही, अशी टीका केली जाते. परंतु अफजल खान ज्यांच्या मनात आहे, तोच टीका करत असून जनतेला सर्वज्ञात आहे. तसेच शिवाजी राजे हे सर्वांचेच दैवत असून त्यांचा वारसाहक्क केवळ शिवसैनिकांना दिलेला नाही.