शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मित्रपक्षांच्या नेत्यांच ठरलं, महायुतीत हव्यात ४६ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 15:01 IST

महायुतीच्या मित्रपक्षांनी अव्वाच्या सव्वा जागा मागितल्याने सेने-भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

मुंबई – भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांची युती अभेद्य आहे. लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकाही युती म्हणूनच लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने विधानसभा निवडणुकीत महायुती होणारे असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र महायुतीच्या मित्रपक्षांनी अव्वाच्या सव्वा जागा मागितल्याने सेने-भाजपची डोकेदुखी वाढली आहे. आगामी निवडणुकीत मित्रपक्षांच्या नेत्यांनी एकूण ४६ जागा मागितल्या आहे. त्यामुळे सेना-भाजप समोर पेच निर्माण झाले आहे.

शिवसंग्राम पक्षाचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषेदेत महायुतीच्या १२ जागांवर दावा केला आहे. दुसरीकडे रासपचे अध्यक्ष व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सुद्धा किमान १२ जागा आम्हाला मिळतील असा दावा केला आहे. त्यातच, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या रिपब्लिकन पक्षाला महायुतीत १० जागा मिळाव्यात अशी मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर महायुतीमध्ये सामील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयतक्रांती संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी १२ जागांची मागणी केली आहे. मित्रपक्षांच्या नेत्यांनी एकूण ४६ जागांची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र असे असले तरीही, जागावाटपाचा फार्म्युला अजूनही ठरला नाही. सेना- भाजपच्या जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतर उरलेल्या जागा मित्रपक्ष यांना दिले जाणार आहेत. मात्र त्याआधीच महायुतीच्या मित्रपक्षांनी अव्वाच्या सव्वा जागा मागितल्या असल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या पारड्यात किती जागा पडणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.