शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दर्यापूरात भाजप की सेना; जागावाटपात युतीच्या नेत्यांची कसोटी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 15:25 IST

दोन्ही पक्षातील नेते या जागेवर आपला दावा करत आहेत.

मुंबई - विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना यांच्यातील युतीच्या हालचालींना सुद्धा वेग आला आहे. भाजप-शिवसेनेतील जागावाटपाचा निर्णय लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र असे असले तरीही दर्यापूर विधानसभा मतदारसंघात जागावाटपावरून दोन्ही पक्षातील नेत्यांची दमछाक होणार असल्याचे बोलले जात आहे. २००९ पर्यंत हा मतदारसंघ सलग पाच वेळेपासून सेनेच्या ताब्यात होत्या. तर गेल्यावेळी भाजपचे रमेश बुंदिले हे येथून निवडून आले आहेत. मात्र युतीतील दोन्ही पक्षातील नेते या जागेवर आपला दावा करत आहेत.

अंजनगाव सुर्जी, दर्यापूर आणि अचलपूर तालुक्यातील काही भाग मिळून दर्यापूर मतदारसंघ बनलेला आहे. १९९० पासून या मतदारसंघात शिवसनेने सलग पाचवेळा मतदारसंघातील नेतृत्व केलं आहे. माजी आमदार प्रकाश भारसाखळे  हे शिवसेनकडून सलग चारवेळा निवडणून आले होते. मात्र २००९ मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला आणि त्यावेळी अभिजित अडसूळ यांनी शिवसेनकडून निवडणूक लढवत सेनेचा बालेकिल्ला कायम ठेवला. मात्र २०१४ मध्ये भाजप-शिवसेना वेगवेगेळे लढले व भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले हे विजयी झाले.

त्यामुळे आता आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षातील नेते या मतदारसंघावर दावा करत आहे. युतीत ही जागा शिवसेनेकडे असून, १९९० ते २००९ पर्यंत सलग पाचवेळा सेनेचा उमेदवार निवडणून आला असल्याने हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपावेळी सेनेला सोडण्याची मागणी शिवसैनिक करत आहेत. तर विद्यमान जागांमध्ये बदल होणार नसल्याचे वक्तव्य खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने, भाजपच्या इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी दर्यापूर मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचा दावा केला आहे.

त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ आपल्याकडेच राहावा यासाठी स्थानिक नेत्यांनी थेट मुंबईपर्यंत सूत्र हलवलेले असल्याचे बोलले जात आहे. तर दर्यापूर मतदारसंघ आपल्याच ताब्यात असावा यासाठी दोन्ही पक्षातील महत्वाचे नेते सुद्धा आग्रही असल्याचे सुद्धा चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र ऐनवेळी ही जागा कुण्याच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.