शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

युतीमुळे संग्राम जगतापांचा मार्ग खडतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 13:03 IST

२०१४ ची निवडणूक सोडली तर याच मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड सलग २५ वर्षे आमदार राहिले आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुका संपताच आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा विजय झाला होता. मात्र यावेळी जगतापांचा मार्ग खडतर असणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. मागच्यावेळी युती न झाल्याने भाजप-शिवसेनेच्या मतांमध्ये झालेल्या विभागणीमुळे जगताप यांचा विजय झाला होता. मात्र यावेळी युती निश्चित मानली जात असल्याने जगताप यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

नगर शहर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. कारण, २०१४ ची निवडणूक सोडली तर याच मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड सलग २५ वर्षे आमदार राहिले आहेत. मात्र गेल्यावेळी भाजप- शिवसेनेमध्ये युती झाली नसल्याने मंताची झालेली विभागणी जगताप यांच्यासाठी फायदेशीर ठरली आणि राठोड यांचा पराभव झाला.  मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे जगताप यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत जगताप यांना ४९ हजार ३७८ मते पडली होती. तर माजी आमदार राठोड यांना ४६ हजार ६१ मते मिळाली होती. त्यातच भाजपकडून रिंगणात उतरलेले अभय आगरकर यांना ३९ हजार ९१३ मते पडली होती. जर युती झाली असती तर आगरकर यांची मते राठोड यांच्या पदरात पडली असती आणि त्यांचा सहज विजय झाला असता. मात्र युती न झाल्यानेच राठोड यांना पराभवाला समोर जावे लागले होते. मात्र यावेळी युती होणार असल्याचे निश्चित समजले जात असून, त्यामुळे जगताप यांचा मार्ग खडतर असणार आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे जर जगताप राष्ट्रवादीतच राहिले तर राठोड यांची उमदेवारी निश्चित समजली जात आहे. तसेच यावेळी पुन्हा जगताप विरोधात राठोड असा सामना पुन्हा पहायला मिळण्याची शक्यता आहे.