शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

युती-आघाडीचा घरोबा!

By admin | Updated: April 25, 2015 04:01 IST

सांगलीत काँग्रेसअंतर्गत वाद उफाळून आला. माजी मंत्री आ. पतंगराव कदम गटाला वगळून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व काँग्रेसमधील माजी मंत्री मदन पाटील

मुंबई : राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्याचे जिल्हा बँकांच्या निवडणुकीच्या राजकारणातही प्रतिबिंब उमटले असून अनेक ठिकाणी भाजपा व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गजांनी पॅनलची निर्मिती केली. त्याचवेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी बहुसंख्य बँकांमध्ये संचालक बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. राज्यातील विविध बँकांमध्ये मिळून सुमारे ५० संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.सांगलीत काँग्रेसमध्ये फूटसांगलीत काँग्रेसअंतर्गत वाद उफाळून आला. माजी मंत्री आ. पतंगराव कदम गटाला वगळून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व काँग्रेसमधील माजी मंत्री मदन पाटील गटाने एकत्रित येत सर्वपक्षीय आघाडी केली. राष्ट्रवादीच्या वाट्याला १५, काँग्रेस २, भाजपा ३ असा फॉर्म्युला निश्चित झाला. त्यानंतर माजी मंत्री जयंत पाटील यांनी शेतकरी सहकार पॅनेलची घोषणा केली. २१ जागांसाठी ५ मे रोजी मतदान होईल.साताऱ्यात ७ बिनविरोधसाताऱ्यात एक खासदार व दोन आमदारांसह सात उमेदवार बिनविरोध निवडले गेले. खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे, बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, आ. प्रभाकर घार्गे, माजी आ. विक्रमसिंह पाटणकर, राजेंद्र राजापुरे आणि अनिल देसाई बिनविरोध निवडून आले. राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसचे आ.जयकुमार गोरे यांचे पॅनेल उभे राहू शकते. अकोल्यात ३९ उमेदवारांची माघारअकोला व वाशिम बँकेत शुक्रवारी ३९ जणांनी अर्ज मागे घेतले. ११ जणांची अविरोध निवड झाली. ९ मतदारसंघांसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. ५ मे रोजी मतदान होईल.नाशिकमध्ये ५ बिनविरोध५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सोसायटी गटातून पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. आ. सीमा हिरे, जे. पी. गावित, माजी आ. दिलीप बनकर, केदा अहेर, परवेझ कोकणी, प्रिया वडजे रिंगणात उतरले आहेत. थोरात-विखे गटात लढतअहमदनगर बँकेत अखेरच्या दिवशी २१३ पैकी १८४ जणांनी अर्ज मागे घेतले. आधी दोन आणि शुक्रवारी चार संचालकांची बिनविरोध निवड झाली. १५ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसमधील राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात गटाने एकत्र येण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला. राष्ट्रवादी आधीच थोरात गटासोबत असून भाजपाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. आ. शिवाजी कर्डिले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आ. राजीव राजळे, चंद्रशेखर घुले, अरूण तनपुरे आणि विद्यमान उपाध्यक्ष उदय शेळके बिनविरोध निवडून आले आहेत.धुळ्याच्या खासदारांची माघारधुळे-नंदुरबार बँकेत १५ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहे. शुक्रवारी माघार घेणाऱ्यामध्ये खा. डॉ.सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, तेजस गोटे यांची नावे आहेत.गडचिरोलीत २० जण अविरोधगडचिरोलीत २० संचालक अविरोध निवडून आले आहे. ओबीसी प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात असल्याने २६ एप्रिल रोजी मतदान होईल. अकोल्यात ११ बिनविरोधअकोला-वाशिम जिल्ह्यात ३९ जणांनी अर्ज मागे घेतले. ११ जणांची अविरोध निवड झाली. आता ९ मतदारसंघात २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १७ जागांसाठी ३५ उमेदवार सांगली : सांगली अर्बन बँकेच्या निवडणुकीत शुक्रवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दोघांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता बँकेच्या १७ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, सतीश पाटील हे एकमेव अपक्ष आहेत. पुजारी व गाडगीळ या दोन पॅनेलमध्ये सरळ लढत होणार आहे. रत्नागिरीत दुरंगी लढतमहत्त्वाच्या उमेदवाराने माघार न घेतल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपाचे सहकार पॅनेल आणि शिवसेनेचे शिवसंकल्प पॅनेल यांच्यातील दुरंगी लढत कायम आहे.सिंधुदुर्गात काँग्रेसमध्ये बंडखोरीमध्यवर्ती बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमधून ४१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता ८७ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, भाजपा व सहकार क्षेत्रात इतर सभासदांनी केलेल्या सहकार वैभव पॅनेल विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी यांच्यात जोरदार लढत होेणार आहे. पाच उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने काँग्रेसला बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)