शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाशी युती हाच पर्याय! संभाजी ब्रिगेडला पुरुषोत्तम खेडेकर यांनी काय दिला राजकीय सल्ला? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 12:05 IST

मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकाच्या संपादकीयमधून त्यांची भूमिका मांडली आहे.

ठळक मुद्देपैशाचे सोंग करता येत नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे विचित्र समीकरण झाले आहे. संभाजी ब्रिगेडला खूप मर्यादा येतात. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपा युती हाच पर्याय उरतो.राजकारणात अंतिम यश मिळणे हेच एकमेव तत्व असते. याठिकाणी कोणीही कायमस्वरुपी मित्र व शत्रू नसतात.

मुंबई – आगामी काळात राज्यात संभाजी ब्रिगेड आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आल्यास नवल वाटायला नको. कारण मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडला राजकीय सल्ला दिला आहे. भाजपाशी युती हाच पर्याय अशा शब्दात खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडला सूचवलं आहे. मात्र त्याबाबत संभाजी ब्रिगेडने निर्णय घ्यावा असंही त्यांनी सांगितले आहे.

मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकाच्या संपादकीयमधून त्यांची भूमिका मांडली आहे. या लेखात पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात की, युवक आणि महिला यांना आकर्षित करण्यासाठी भविष्यकाळात ऊर्जेची गरज आहे. आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी धडपड सुरू पाहिजे. पैशाचे सोंग करता येत नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे विचित्र समीकरण झाले आहे. हे बदलायचे असेल तर संभाजी ब्रिगेड राजसत्तेत आणणे गरजेचे आहे. संभाजी ब्रिगेडचे सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी राजनैतिक संबधात वाढ वा युती याबाबत गंभीरपणे विचार करावा लागेल. महाविकास आघाडीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी(NCP-Shivsena-Congress) या तिन्ही पक्षांची इच्छा असली तरी ते संभाजी ब्रिगेडला वाटा देण्यास नकार देण्याची शक्यता अधिक आहे. त्यांची प्रवृत्ती संभाजी ब्रिग्रेडला दूर ठेऊन केवळ त्यांच्या नावाचा व कामाचा एकतर्फी लाभ घेणे आहे. तसेच ते संभाजी ब्रिगेडला गृहित धरून आहेत असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ? संभाजी ब्रिगेडचे भारतीय जनता पार्टीसोबत युतीचे संकेत

तसेच भाजपा(BJP) सत्तेत आली तरी हरकत नाही, पण संभाजी ब्रिगेडला(Sambhaji Briged) सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे अशी या तिन्ही पक्षांची मानसिकता आहे. तर काही लहान पक्षनेते संभाजी ब्रिगेडबाबत गैरसमज पसरवत असतात. या परिस्थितीत संभाजी ब्रिगेडला सत्ता हस्तगत करायची आहे. संभाजी ब्रिगेडला खूप मर्यादा येतात. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपा युती हाच पर्याय उरतो. तसे संभाजी ब्रिगेडपेक्षा वेगळ्याच अर्थाने भाजपाला अस्पृश्य मानले जाते. मराठा सेवा संघ आणि RSS यांची तत्वे पूर्णपणे परस्परविरोधी आहेत. परंतु राजकारणात अंतिम यश मिळणे हेच एकमेव तत्व असते. याठिकाणी कोणीही कायमस्वरुपी मित्र व शत्रू नसतात. वेळ आणि संधी हेच राजकीय सत्य आहे. लोक काय म्हणतील यावर राजकारण केले जात नाही. शिवसेना-भाजपा आज राणे प्रकरणामुळे एकमेकांचे कट्टर शत्रू झालेत. पण सोन्याचे अंडे देणारी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी ते पुन्हा एकत्र येऊ शकतात. त्यासाठी तडजोड होऊ शकते असंही पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सध्या महाविकास आघाडी सरकार उदाहरण आहे. आता स्वबळावर राजकारण हे मत भूतकाळ जमा झाले. पहिले प्राधान्य समविचारी पक्षांनाच आपला स्वाभिमान सांभाळून देणे याबाबत दुमत नाही. पण जमलेच नाही परस्परविरोधी पक्षासोबत युती व वाटाघाटी करुन योग्य निर्णय घ्यावा लागतो. गेल्या काही वर्षापासून तत्ववादी मोठमोठे राजकीय नेते तसेच पक्ष तत्व व आदर्श गुंडाळून राजकारण साधत आहेत. आजतरी संभाजी ब्रिगेडला सत्तेसाठी काही ना काही तडजोड करावीच लागेल. याबाबत गंभीरपणे विचार करुन योग्य भूमिका आणि निर्णय घ्यावा ही सूचना आहे. संभाजी ब्रिगेड हा सर्वच राजकीय पक्षांना जबरदस्त पर्याय आहे. संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते यांनी आपली सर्वच ताकद वाढवलीच पाहिजेत. स्वबळावर वा युतीत जास्तीत जास्त जागा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जिंकल्या पाहिजेत. त्यासाठी पुढील काळात फक्त आणि फक्त १०० टक्के राजकारण करावे कारण राजकारण हेच समाजकारणाचे अंतिम उदिष्ट आहे असा राजकीय सल्ला पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडला दिला आहे.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडBJPभाजपा