शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

युतीतील दुरावा आणि एकोप्याला नागपुरी किनार!

By admin | Updated: December 3, 2014 00:40 IST

विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला जशी अनेक राजकीय वादळाची पार्श्वभूमी आहे तशीच भाजप आणि सेना या मित्रपक्षांमधील दुरावा आणि एकोप्याचीसुद्धा किनार आहे. शिवसेनेची तटबंदी

चंद्रशेखर बोबडे - नागपूर विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला जशी अनेक राजकीय वादळाची पार्श्वभूमी आहे तशीच भाजप आणि सेना या मित्रपक्षांमधील दुरावा आणि एकोप्याचीसुद्धा किनार आहे. शिवसेनेची तटबंदी तोडून भुजबळ व त्यांचे सहकारी बाहेर पडल्यावर नागपूर अधिवेशनातच भाजपने विरोधी पक्षनेतेपद पटकाविल्याने दोन्ही पक्षात दुरावा निर्माण झाला होता. आता नागपूरचे अधिवेशन सुरळीत पार पडावे म्हणून निवडणुकीत परस्परांच्या विरोधात लढलेले दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. १९९१ च्या नागपूर हिवाळी अधिवेशन काळात छगन भुजबळ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विरोधी पक्षनेते पद हे शिवसेनेकडे होते व मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेत फूट पडल्याने त्यांची सदस्यसंख्या कमी झाली. हीच संधी साधून भाजपने या पदावर दावा केला आणि गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले. भाजपच्या या खेळीमुळे शिवसेनेत नाराजी होती व त्यातून दुरावाही निर्माण झाला होता. मात्र गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून संपूर्ण राज्य पालथे घातले व १९९५ मध्ये युतीची सत्ता आणण्यात मोठे योगदान दिले होते. त्यानंतर १५ वर्षे विरोधी पक्षात बसल्यावर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढतील असे वाटत असतानाच युती दुभंगली. दोन्ही पक्ष परस्पराशी कट्टर शत्रूप्रमाणे लढले. निवडणुकीत भाजप बहुमताचा आकडा पार करू न शकल्याने ते शिवसेनेच्या मदतीने सत्ता स्थापन करेल असे वाटत असतानाच ‘राष्ट्रवादी’च्या मदतीने शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले. त्यातून दोन्ही पक्षातील दुरावा आणखी वाढला. मात्र हा दुरावा संपवून दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनच कारणीभूत ठरले. अल्पमतातील सरकार, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे होणारी टीका आणि शिवसेनेसारखा आक्रमक विरोधी पक्ष पुढे असेल तर अधिवेशनाला तोंड देणे अवघड असल्याचे लक्षात आल्यावरच भाजपने पुन्हा शिवसेनेशी मैत्रीचा हात पुढे केला. आता हे दोन्ही एकत्रितपणे अधिवेशनाला सामोरे जातील. युतीतील दुरावा आणि एकोप्याला असलेली नागपुरी किनार ही अशी आहे.