शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

महाविद्यालयांत काेट्यवधींची अनामत रक्कम पडून, कॉप्स संघटनेचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 03:50 IST

colleges : अनामत रकमेचा उपयोग व्हावा यासाठी ती ईबीसी विद्यार्थ्यांच्या विविध गरजांसाठी वापरावी, अशी मागणी त्यांनी राज्याच्या उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण संचालकांना केली.

मुंबई : राज्यातील विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना ठरावीक रक्कम अनामत म्हणून घेतात. अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ती महाविद्यालय प्रशासनाकडे जमा असते. त्यानंतर नियमावलीनुसार ती विद्यार्थ्यांना देणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक महाविद्यालये ती परत देत नसल्याने राज्यातील ३,१४१ महाविद्यालयांत अशी ५०० कोटींहून अधिक अनामत रक्कम पडून असल्याचा दावा कॉप्स (केअर ऑफ पब्लिक सेफ्टी) संघटनेचे कार्यालयीन अधीक्षक अमर एकाड यांनी केला.      या अनामत रकमेचा उपयोग व्हावा यासाठी ती ईबीसी विद्यार्थ्यांच्या विविध गरजांसाठी वापरावी, अशी मागणी त्यांनी राज्याच्या उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण संचालकांना केली. ईबीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात अनेकदा आर्थिक मदत अपुरी पडते. त्यामुळे ईबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह व मेस शुल्क, शैक्षणिक साहित्य - वह्या, पुस्तके, दफ्तर इ., वैद्यकीय सुविधा, कमवा व शिका योजनेसाठी निधी उपलब्ध करणे, अशा ४ घटकांवर ही रक्कम खर्च करण्याचे परिपत्रक काढून तत्काळ अंमलबजावणीची मागणी एकाड यांनी संचालक व सर्व विभागीय सहसंचालक उच्च व तंत्र शिक्षण यांच्याकडे केली.

काही महत्त्वाच्या महाविद्यालयांकडे असलेली अनामत रक्कम१)    जय हिंद महाविद्यालय, मुंबई     ५२,५०,५१०/-२)    लाला लजपतराय महाविद्यालय, मुंबई     ६६,९५,८१०/-३)    चेतना महाविद्यालय, मुंबई     ३८,९९,३८२/-४)     एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई     ३३,३३०००/-५)     के.सी. महाविद्यालय, मुंबई      ४२,३५,११५/-६)     मॉडर्न महाविद्यालय, पुणे      १४,२८,४३०/-  ७)     फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे      ११,७३,१००/-८)     आनंद निकेतन महाविद्यालय, चंद्रपूर      ५,२७,२४२/-९)     लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालय, सिंधुदुर्ग      ४,२८,२८४/-१०)     कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय रायगड      १५,७७,८९६/ -

टॅग्स :collegeमहाविद्यालय