शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सायबर, हवाई अशा सर्वप्रकारच्या हल्ल्यांसाठी सैैन्यदल सक्षम :  एस. के. सैैनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 19:07 IST

पुलवामाच्या घटनेमुळे आर्मी डळमळीत झालेली नाही. आर्मी दहशतवाद्यांशी तोंड देण्यासाठी नेहमीच सज्ज राहते.

ठळक मुद्देसायबर हल्ला किंवा हवाई हल्ल्यासाठी आपली यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास पुलवामा येथील घटनेत दहशतवाद्यांनी स्थानिक तरूणांचा केला वापर कॅँटोन्मेंटमध्ये आज अनेक समस्या आहेत. त्या सोडविणे आवश्यक

पुणे : आपण नवीन तंत्रज्ञानासह आपला शस्त्रसाठा सज्ज केलेला आहे. तसेच आपण लढण्यासाठी देखील परिपूर्ण आहोत. कारण युध्दात मागे राहून चालत नाही. त्यासाठी अद्ययावत राहिलेच पाहिजे. आपले सैैन्य दल लढण्यासाठी अत्यंत सक्षम आहे. सायबर हल्ला किंवा हवाई हल्ल्यासाठी आपली यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास दक्षिण कमानचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैैनी यांनी व्यक्त केला. दक्षिण कमानतर्फे दहशतवाद्यांशी लढणाऱ्या जवानांना, अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जवानांना व त्यांच्या कुटुंबीयांना योग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीवर सैैनी म्हणाले, सैैन्यातील जवानांच्या कुटुंबीयांना त्यांना काय सेवा, सुविधा लागत आहेत, त्या दिल्या जात आहेत. पेन्शन योजना, आरोग्य सेवा आदींबाबत सैैन्य दल संपूर्णत: सहकार्य करीत आहे. गेल्या महिन्यात पुण्यातील मेजर नायर शहीद झाले. त्यांची पत्नी शारीरिकदृष्ट्या विशेष आहेत. त्यांनाही योग्य  ती मदत देण्यात येत आहे. ...........................स्थानिक वाहन, तरूणांचा पुलवामामध्ये वापर पुलवामाच्या घटनेमुळे आर्मी डळमळीत झालेली नाही. आर्मी दहशतवाद्यांशी तोंड देण्यासाठी नेहमीच सज्ज राहते. पुलवामा येथील घटनेत दहशतवाद्यांनी स्थानिक तरूणांचा वापर केला आहे. स्थानिक वाहनांचाही समावेश केला आहे. असा वापर यापूर्वी देखील करण्यात आलेला आहे, अशी माहिती एस. के. सैैनी यांनी दिली. ........................कॅँटोन्मेंटला योग्य सुविधा द्यायलाच हव्या कॅँटोन्मेंटमध्ये आज अनेक समस्या आहेत. त्या सोडविणे आवश्यक आहेत. वाढीव एफएसआय, इमारत पुनर्बांधणी, मुलभूत सुविधा आदी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर योग्य निर्णय होणे गरजेचे आहे. शहरातील कॅँटोन्मेंटचा परिसर हा सर्वात हिरवाई असलेला आहे. कारण तो सैैन्यदलाकडे आहे. सध्या शहरांची लोकसंख्या वाढत आहे, विकास वाढत आहे. त्याप्रमाणात कॅँटोन्मेंटमध्ये सेवा मिळत नाहीत. कॅँटोन्मेंटमध्ये सर्व सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तरच त्यांचाही विकास होईल, असे एस. के. सैैनी म्हणाले.  

टॅग्स :Puneपुणेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान