शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

'या' सर्व नेत्यांसह अखेर फडणवीसही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 17:23 IST

अखेरीस मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा देताच भाजपमधील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून राज्यातील विरोधीपक्षनेतेपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुंबई - भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नेते असताना मजल दर मजल करत देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांना अल्प मतात का होईना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आपण पुन्हा येईल ही घोषणा खरी ठरवली होती. परंतु, राज्यात झालेल्या राजकीय भुकंपामुळे ज्याप्रमाणे भाजपचे इतर नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतातून बाहेर गेले, तसच काहीसं आता फडणवीस यांच्यासोबतही झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्षांची सत्ता संपुष्टात आणत भारतीय जनता पक्षाने राज्यात 2014 मध्ये सत्ता मिळवली. अनेक दिग्गज नेत्यांनी वर्षानुवर्षे दिलेल्या लढ्यानंतर भाजपला आपला मुख्यमंत्री विराजमान करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नेते इच्छूक होते. मात्र मुख्यमंत्रीपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडली. फडणवीसांच्या पाच वर्षांच्या काळात भाजपमधील मुख्यमंत्रीपदासाठीचे सर्व इच्छूक हळूहळू गायब झाले आणि केवळ फडणवीस उरले होते. मात्र शिवसेनेची आक्रमक भूमिका आणि पवारांची खेळी यामुळे केवळ फडणवीसच नव्हे तर भाजपही सत्तेतून बाहेर फेकले गेले. 2014 पूर्वी भाजपकडून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर कन्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, नितीन गडकरी, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक होते. मात्र भाजप नेतृत्वाने फडणवीस यांनाच झुकते माप दिले. तेव्हापासून भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत लागली होती. मात्र 2019 येईपर्यंत हे सर्वच नेते शर्यतीत मागे पडले. तर चंद्रकांत पाटील यांच नाव पुढं आलं. मात्र 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी पाटील यांना रोखून धरत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळविण्यात बाजी मारली. मात्र त्यांची दुसरी टर्म आठ दिवसही चालू शकली नाही. ज्यांच्यामुळे नवीन सरकार घाईघाईने स्थापन करण्यात आले, त्या अजित पवारांनीच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि फडणवीसांचे स्वप्न भंग झाले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भरवशावर भाजपशी हात मिळवली केली होती. मात्र आमदार सोबत राहिले नसल्याने भाजप सरकार कोसळले. अखेरीस मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा देताच भाजपमधील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून राज्यातील विरोधीपक्षनेतेपद आता कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.