शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

'या' सर्व नेत्यांसह अखेर फडणवीसही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 17:23 IST

अखेरीस मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा देताच भाजपमधील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून राज्यातील विरोधीपक्षनेतेपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुंबई - भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नेते असताना मजल दर मजल करत देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांना अल्प मतात का होईना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आपण पुन्हा येईल ही घोषणा खरी ठरवली होती. परंतु, राज्यात झालेल्या राजकीय भुकंपामुळे ज्याप्रमाणे भाजपचे इतर नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतातून बाहेर गेले, तसच काहीसं आता फडणवीस यांच्यासोबतही झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्षांची सत्ता संपुष्टात आणत भारतीय जनता पक्षाने राज्यात 2014 मध्ये सत्ता मिळवली. अनेक दिग्गज नेत्यांनी वर्षानुवर्षे दिलेल्या लढ्यानंतर भाजपला आपला मुख्यमंत्री विराजमान करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नेते इच्छूक होते. मात्र मुख्यमंत्रीपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडली. फडणवीसांच्या पाच वर्षांच्या काळात भाजपमधील मुख्यमंत्रीपदासाठीचे सर्व इच्छूक हळूहळू गायब झाले आणि केवळ फडणवीस उरले होते. मात्र शिवसेनेची आक्रमक भूमिका आणि पवारांची खेळी यामुळे केवळ फडणवीसच नव्हे तर भाजपही सत्तेतून बाहेर फेकले गेले. 2014 पूर्वी भाजपकडून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर कन्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, नितीन गडकरी, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक होते. मात्र भाजप नेतृत्वाने फडणवीस यांनाच झुकते माप दिले. तेव्हापासून भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत लागली होती. मात्र 2019 येईपर्यंत हे सर्वच नेते शर्यतीत मागे पडले. तर चंद्रकांत पाटील यांच नाव पुढं आलं. मात्र 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी पाटील यांना रोखून धरत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळविण्यात बाजी मारली. मात्र त्यांची दुसरी टर्म आठ दिवसही चालू शकली नाही. ज्यांच्यामुळे नवीन सरकार घाईघाईने स्थापन करण्यात आले, त्या अजित पवारांनीच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि फडणवीसांचे स्वप्न भंग झाले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भरवशावर भाजपशी हात मिळवली केली होती. मात्र आमदार सोबत राहिले नसल्याने भाजप सरकार कोसळले. अखेरीस मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा देताच भाजपमधील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून राज्यातील विरोधीपक्षनेतेपद आता कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.