शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

सगळं अजबच!

By admin | Updated: May 14, 2017 04:38 IST

आयएनटी आदित्य बिर्ला सेंटर फॉर परफॉर्मिंग आटर््स अ‍ॅण्ड रिसर्च आणि संगीत कला केंद्र यांच्यातर्फे चित्रपट संगीतविषयक कार्यक्रम होतात ते

- रविप्रकाश कुलकर्णीआयएनटी आदित्य बिर्ला सेंटर फॉर परफॉर्मिंग आटर््स अ‍ॅण्ड रिसर्च आणि संगीत कला केंद्र यांच्यातर्फे चित्रपट संगीतविषयक कार्यक्रम होतात ते नेहमीच वेधक असतात. त्यात कुशल गोपालका यांची टिकाटिप्पणी असते. त्यानेदेखील प्रेक्षकांच्या स्मृतिरंजनाला धुमारे फुटतात. म्हणून रसिक त्यांच्या कार्यक्रमाची वाट पाहत असतात.कामिनी कौशलचा ९० वा वाढदिवस आणि अर्थात, त्यांच्यावर चित्रित केलेली गाणी असा कार्यक्रम कळल्यानंतर मोह आवरणं कठीणच होतं.आता कामिनी कौशल म्हटलं की, ‘नदियाके पार’, ‘आरजू’, ‘गीतान’, ‘बिरज बहू’ अशा चित्रपटांची नामावली डोळ्यापुढे तरळून जाते. तर एखादा पठ्ठा म्हणेल, एकेकाळी शहीदची ही नायिका मनोजकुमारच्या ‘शहीद’मध्ये भगतसिंगाची आई म्हणून दिसते...मला मात्र कामिनी कौशल म्हटलं की, ‘शबनम’मध्ये ‘ये दुनिया रूप की चोर, बचाले मुझे बाबू, बचाले मुझे बाबू, बचाले मुझे बाबू’ म्हणत ठुमकणारी ती आठवते. त्यातदेखील शमशाद बेगम यांनी ‘एक मराठा साहब आला’ हे गाणं काय ठसक्यात म्हटलं आहे. खरं सांगायचं तर आता हे सगळं मी यू ट्यूबवर पाहू शकतो.पण मोठ्या पडद्यावर अनेकांच्याबरोबर अशी गाणी पाहणं हा एक वेगळा अनुभव असतो. म्हणून कुशल गोपालकाचा एक सहकारी सुभाष भट याला म्हटलंदेखील की, ‘बाकी आणि काय दाखवायची ती दाखवा पण ‘शबनम’ वगळू नकोस रे बाबा...’पण त्याच वेळेला मनात आलं नव्वदीची कामिनी कौशल कशी दिसेल? जरा जर्जर असं कलावंताच रूप अस्वस्थ करून जातं. ते दोन्ही बाजूंनी असावं म्हणजे त्या कलावंताच्या लेखी आणि चाहत्यांच्या लेखीपण. दिलीप प्रभावळकर यांनी ‘हसतफसवीत’ कृष्णराव हेरंबकरांच्या कैफियतीत नेमकं मांडलं आहे. त्यात एक प्रसंग आहे, त्यांचे चाहते असलेले वाघमारे डायरी पुढे करून कृष्णरावांची स्वाक्षरी मागतात. पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी ‘एकच प्याला’ नाटकाच्या वेळी केलेल्या स्वाक्षरीच्या शेजारीच आताची स्वाक्षरी करा, असं सांगतात. त्यावर कृष्णराव म्हणतात, ‘‘आता सही नाही करत मी, हात कापतो माझा. काय आहे कलाकारांच्या वार्धक्याची खूण त्यांच्या संग्रही राहायला नको...’’हे सगळं अटळच. न टाळता येणारं...पण त्याचवेळी मनात आलं, ज्या कलावतीनं इतकी वर्षं अक्षय आनंद दिला तिला त्याची पोचपावती प्रत्यक्ष देऊन उभयपक्षी आनंद देण्याची संधी अनासायास आली आहे तर ती चुकवा कशाला?अशा संमिश्र भावनेनं गेलो खरा. खरं सांगायचं तर राहवलंदेखील नाही...अशा वेळी वातावरणात उत्कंठा भरलेली असतेच. ‘‘आल्या आल्या’’ कुणी तरी म्हटलं. सगळं सभागृह उठून उभं राहिलं. वाटलं वयोवृद्ध, थरथरणारी, लटलट मान हलणारी, कदाचित व्हीलचेअरवरून असेल असंही वाटलं...’’पण पाहतो तो काय, चक्क आपली पोनी टेल बांधत शिडशिडीत बांध्याच्या आजीबाई आत येत म्हणाल्या, ‘‘मी आलेच फ्रेश होऊन...’’या कामिनी कौशल यावर क्षणभर विश्वास बसेना. डोळेच विस्फारले...बाकी पुढचा तास सव्वा तास म्हणजे कुशल गोपालका गाणी दाखवत होता आणि ऐकवत होता. अर्थात, त्यांच्या जोडीला कामिनी कौशलची कॉमेन्ट्री. ती मूळची उमा कश्यप. पण प्रथमच नीचा नगरमध्ये चेतन आनंदने तिला घेतलं तेव्हा नाव बदललं. कारण चेतनच्या बायकोचं नाव उमाच होतं. मग कामिनी कौशल नाव घेतलं. कारण तिचा ‘के’ लकी ठरतो. म्हणून तिच्या मुलीचं नाव पण ‘क’ असलेलं आहे!मुलांसाठी तीन पुढे ‘पराग’मध्ये कथा लिहिल्या. त्यांच्यासाठीच बालचित्रपट केले. कठपुतळ्यांचे - पपेट शो केले. असं बरंच काही.आणि मुख्य म्हणजे सफळ संस्कार केला.याचं ढळढळीत प्रत्यंतर म्हणजे या कार्यक्रमात कामिनी कौशलचे मुलगे, मुली, त्यांची मुलं... थोडक्यात नातवंडं पतवंडं हजर होती. सगळ्यांच्या नजरेत आदरभाव होता आणि हीच कृतकृत्यता कामिनी कौशलच्या बोलण्यातून, देहबोलीतून व्यक्त होत होती!शेवटी कृतार्थता म्हणजे तरी वेगळं काय असतं? जाता जाता या प्रसंगाची खूणगाठ म्हणून स्वाक्षरीसाठी वही पुढे केली. बार्इंनी लफ्फेदार सही केली. ती पाहता कोण म्हणेल ही नव्वदीच्या व्यक्तीची सही म्हणून? सगळंच अजब!