शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

सगळाच सावळा गोंधळ! शेतकरी हिताच्या चर्चेसाठी शरद पवार राज्यसभेत नव्हते, चंद्रकांत पाटलांचा टोला

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 21, 2020 17:12 IST

शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा होत असताना 'जाणता राजा' म्हणवणारे शरद पवार राज्यसभेत चर्चेसाठी उपस्थित राहत नाहीत. यांना शेतकऱ्यांच्या हिताची परवा नाही. यांना स्वार्थ अधिक महत्त्वाचा वाटतो.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या हिताचा कायदा होत असताना 'जाणता राजा' म्हणवणारे शरद पवार राज्यसभेत चर्चेसाठी उपस्थित राहत नाहीत.यांना शेतकऱ्यांच्या हिताची परवा नाही. यांना स्वार्थ अधिक महत्त्वाचा वाटतोशिवसेनेला एका दिवसात काय साक्षात्कार झाला?

कोल्हापूर : राज्यसभेत रविवारी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी, ही विधेयके मंजूर करण्यात आली. यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेला जबरदस्त टोला लगावला आहे. 'शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा होत असताना 'जाणता राजा' म्हणवणारे शरद पवार राज्यसभेत चर्चेसाठी उपस्थित राहत नाहीत. तर शिवसेना लोकसभेत ज्या विधेयकांना पाठिंबा देते, त्याच विधेयकांना राज्यसभेत विरोध करते. हा सगळाच सावळा गोंधळ आहे. यांना शेतकऱ्यांच्या हिताची परवा नाही. यांना स्वार्थ अधिक महत्त्वाचा वाटतो," असे पाटील यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेला एका दिवसात काय साक्षात्कार झाला? -पाटील म्हणाले, संसदेत मंजूर झालेली ही विधेयके ही शेतकऱ्याच्या हिताची आहेत. मात्र, तरीही राजकीय विरोधासाठी विरोध म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने या विधेयकांना सभागृहात विरोध केला. शिवसेनेने तर या विधेयकांना पहिल्या दिवशी लोकसभेत पाठिंबाही दर्शवला होता आणि दुसऱ्या दिवशी मात्र राज्यसभेत विरोध केला. त्यांना एका दिवसात असा काय साक्षात्कार झाला? असा सवालही पाटील यांनी यावेळी केला. एवढेच नाही, तर खुद्द काँग्रेसनेच २०१९च्या निवडणूक जाहीरनाम्यात हा विषय मांडला होता. याची आठवण करून देत, मग ते आता या विधेयकाला विरोध का करत आहेत, असा प्रश्नही त्यांनी केला.

...म्हणून अकाली दलाने केला विरोध -पंजाबमधील अकाली दलासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, पंजाबमध्ये बहुसंख्य बाजार समित्यांवर अकालीदलची सत्ता आहे. ही सत्ता जाऊ नये, म्हणून अकाली दलाने या विधेयकांना विरोध केला आहे. या वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य कुटुंबातूनआले आहेत. त्यांना शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण आहे. ते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे, असेही पाटील म्हणाले.

कंगनाने शब्द जपून वापरावेत -कंगना रणौतसंदर्भात बोलताना पाटिल म्हणाले, शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या कंगना राणौतच्या मताशी आपण सहमत नाही. मात्र, अनेक वेळा तिची भूमिका योग्य असते, पण ती मांडण्याची पद्धत चुकीची आहे. तिने शब्द जपून वापरावेत, कुणाच्या भावना दुखावू नयेत. आपल्या बोलण्याने काय दुष्परिणाम होता, हे तिला कळत नाही, असेही पाटील म्हणाले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार