शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

कर्जमाफी अंमलबजावणीवर सर्वपक्षीय आमदारांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 07:50 IST

अद्याप ५४ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी असून, ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत दिले. 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफी केली असली, तरी तिची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत सर्वपक्षीय आमदारांनी व्यक्त केली. अद्याप ५४ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी असून, ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत दिले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर बोलताना सरकारने अद्यापही ३५ हजार ६२९ शेतकऱ्यांना १५६ कोटी रूपयांची कर्जमाफी दिली नसल्याचे निदर्शनास आणले. तर शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी कोरोना काळात कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प झाल्याने या दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजाची रक्कम वाढली असून, ती माफ करावी, अशी मागणी केली. काँग्रेसचे अमर राजूरकर यांनीही कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित असल्याचे म्हटले. कोरोनाकाळात निधीची कमतरता आणि आधार प्रमाणिकरणातल्या ५४ हजार शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणी वगळता सुमारे ९७ टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, तर ५४ हजारपैकी ४५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असल्याने २०० कोटींचा निधी वर्ग केल्याचे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. दरम्यान, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची घोषणा अर्थसंकल्पात केली असून, या आर्थिक वर्षातच लाभार्थी शेतकऱ्यांना  त्याचे वाटप होईल, अशी ग्वाही सहकार मंत्र्यांनी दिली.