शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

कर्जमाफी अंमलबजावणीवर सर्वपक्षीय आमदारांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 07:50 IST

अद्याप ५४ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी असून, ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत दिले. 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफी केली असली, तरी तिची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत सर्वपक्षीय आमदारांनी व्यक्त केली. अद्याप ५४ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी असून, ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत दिले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर बोलताना सरकारने अद्यापही ३५ हजार ६२९ शेतकऱ्यांना १५६ कोटी रूपयांची कर्जमाफी दिली नसल्याचे निदर्शनास आणले. तर शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी कोरोना काळात कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प झाल्याने या दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजाची रक्कम वाढली असून, ती माफ करावी, अशी मागणी केली. काँग्रेसचे अमर राजूरकर यांनीही कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित असल्याचे म्हटले. कोरोनाकाळात निधीची कमतरता आणि आधार प्रमाणिकरणातल्या ५४ हजार शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणी वगळता सुमारे ९७ टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, तर ५४ हजारपैकी ४५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असल्याने २०० कोटींचा निधी वर्ग केल्याचे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. दरम्यान, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची घोषणा अर्थसंकल्पात केली असून, या आर्थिक वर्षातच लाभार्थी शेतकऱ्यांना  त्याचे वाटप होईल, अशी ग्वाही सहकार मंत्र्यांनी दिली.