शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अवघा महाराष्ट्र दिव्यांनी उजळला; 'जय श्री राम' घोषणेनं सर्वत्र भक्तीमय वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 21:29 IST

बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला

अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता सर्वत्र पुन्हा दिवाळी साजरी केली जात आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दिपोत्सव केला जात आहे. अमरावतीच्या हनुमान गढीवर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला. हजारो दिवे लावून परिसर उजळून टाकला. खासदार नवनीत राणा यांनी जय श्री राम व ओम चित्र दिव्यांनी रेखाटले. हजारो दिव्यांनी हनुमानगढी उजाळून गेली होती. तर यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष करण्यात आला. 

बुलढाण्यातही रुद्र ढोल ताशा पथकाच्या वतीने तब्बल ५०१ दिव्यांनी "जय श्रीराम" असे नाव साकारण्यात आले. जय श्रीराम साकारलेल्या नावाचे दिवे नगरपालिकेच्या सफाई करणाऱ्या महिलांनी प्रज्वोलित केले. यासह फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषही करण्यात आला. हा जल्लोष शहरातील पाहण्यासाठी संगम चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली. 

बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवात कृषीमंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या तिघा बहिण भावांनी सहभाग नोंदविला आहे. आज अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना ठेवली होती. यातूनच वैद्यनाथ मंदिर परिसरात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वैद्यनाथ मंदिर परिसरात ११ हजार दीप प्रज्वलन करण्यात आले.

जालन्यात ठिकठिकाणी महिला दिवे लावून राम दिवाळी साजरी करण्यात येत आहे. जालना शहरातील बडी सडक येथील श्रीराम मंदिर परिसरात रामभक्तांनी दिव्यांची आरास केली असून परिसर दिव्यांच्या प्रकाशाने लखलखून गेला आहे. नागरिक दिवे लावण्यासाठी मोठी गर्दी करीत असून दिव्यांच्या प्रकाशाने आसमंत प्रकाशमय झाला आहे.कल्याण शहर शाखेच्या वतीने शिवकालीन किल्ले दुर्गाडीला ५ हजार दिव्यांची आरास करण्यात आली आहे. शेकडो नागरिकांनी या दीप महोत्सवात सहभाग घेतला होता. या दिव्यांच्या रोषणाईने किल्ले दुर्गाडी उजळून निघाला होता.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या