शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राज्यातील सर्व नगराध्यक्ष 'वर्षा'वर धडकणार, सामूहिक राजीनामे देणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 16:50 IST

राज्यातील सर्व नगराध्यक्ष हे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देऊन आपले सामूदायिक राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे  देणार आहेत

 - मनोहर कुंभेजकर

मुंबई - राज्यातील नगराध्यक्षांना पूर्वी प्रमाणे असलेले अधिकार मिळवेत या मागणीसाठी सर्व नगराध्यक्ष हे लवकरच मुख्यमंत्र्यांच्यावर्षा बंगल्यावर धडक देऊन आपले सामूदायिक राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे  देणार आहेत. असा ठराव आज राज्यस्तरीय नगराध्यक्षांच्या परिषदेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.राज्यात 367 नगरपरिषदा व नगरपंचायती आहेत. मे 2016 व मे 2018  रोजी नगरपरिषदा  कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल केल्यामुळे नगराध्यक्षांचे अधिकार कमी झाले असून . 2016 पूर्वी असलेले नगराध्यक्षांचे अधिकार मिळावेत या मागणीसाठी आता राज्यातील सर्व नगराध्यक्ष एकवटले असून या महिन्यात वर्षावर धडक देऊन राज्यातील सर्व नगराध्यक्ष सामूदायिक राजिनामे देणार असल्याची घोषणा आज मुंबईत अंधेरीत झालेल्या राज्यस्तरीय नगराध्यक्षांच्या परिषदेत करण्यात आली.अश्याप्रकरचा ठराव हा आम्ही एकमताने  मंजूर केला अशी माहिती नगरपरिषदा महासंघाचे अध्यक्ष व हिंगणघाट नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी लोकमतशी बोलतांना दिली.यावेळी राज्यातील सुमारे 100 नगराध्यक्ष उपस्थित होते.

नगरपरिषदा कायदा 58(2) प्रमाणे पूर्वी नगरपरिषद कायद्यात नगराध्यक्षांना असलेले वित्तीय अधिकार राज्य शासनाने काढले आहेत, तर 77(1) कायद्यात आता पूर्वी असलेल्या नगराध्यक्षांच्या अधिकारात कपात करण्यात आली आहे.या कायद्यात पूर्वी  मुख्य अधिकारी हे नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार व त्यांच्या देखरेखीखाली काम करत असत.तसेच  नगराध्यक्षांचे मुख्य अधिकाऱ्यांवर नियंत्रण होते, तो अधिकार आता काढण्यात आला.तसेच त्याचा गोपनीय अहवाल लिहीण्याचे अधिकार जे नगराध्यक्षांना होते ते देखिल काढण्यात आले आहेत.नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेला मुख्य  अधिकारी यांना हजर राहणे पूर्वी बंधनकारक होते,आता हे बंधन काढण्यात आले आहे.महापालिकेत असलेल्या आयुक्तांप्रमाणे आता नवीन कायद्याप्रमाणे मुख्य अधिकारी यांना अधिकार मिळणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यातील सर्व नगराध्यक्षांना पूर्वी प्रमाणे कलम 58(2)व कलम 77(1)प्रमाणे अधिकार मिळावेत या मागणीसाठी आपण 3 आमदार व 12  नगराध्यक्षांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर अधिवेशनात भेट घेतली होती.त्यावेळी सरकारने मे 2016 व मे 2018  मध्यें केलेल्या नगरपरिषदा कायद्यात केलेली दुरुस्ती रद्द करून पूर्वीप्रमाणे नगराध्यक्षांना अधिकार देऊ असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.मात्र अजून याबाबतीत काहीच पूर्तता झाली नाही.त्यामुळे ही टोकाची भूमिका नगरपरिषदा महासंघाला घ्यावी लागली असल्याचे त्यांनी सांगितले.लोकप्रतिनिधी म्हणून नगराध्यक्षांकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत,मात्र आम्हाला अधिकारच नसल्याने आमची अवस्था कुबड्यांप्रमाणे झाली आहे.याउलट नगरपरिषदांमधील मुख्य अधिकारी शिरजोड झाले असून ते राज्यातील नगराध्यक्षांना जुमानतच  नसल्याची टिका प्रेम बसंतानी यांनी शेवटी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र