शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

केरळमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य; ठाकरे सरकारचे निर्देश

By देवेश फडके | Published: February 11, 2021 1:30 PM

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारने केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शकतत्वे लागू केली आहेत. तत्पूर्वी गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा आणि राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट बंधनकारक करण्यात आली होती. 

ठळक मुद्देकेरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वेआरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारककोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

मुंबई :महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यात कोरोनाची स्थिती अद्यापही गंभीर असलेली पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळहूनमहाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी आता कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना उद्धव ठाकरे सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत. (all incoming passengers from kerala to maharashtra will have to present RT-PCR negative test)

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारने केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शकतत्वे लागू केली आहेत. तत्पूर्वी गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा आणि राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट बंधनकारक करण्यात आली होती. 

कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते.  केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, केरळहून रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी हा आदेश बंधनकारक आहे. 

दिलासादायक! आठवडाभरात ६०० जिल्ह्यांत एकही कोरोना मृत्यू नाही; नियंत्रणाच्या दिशेने वाटचाल 

प्रवाशांना हवाई मार्गाने महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी ७२ तास  आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. विमानात बसण्याची परवानगी देण्यापूर्वी प्रवाशांचे कोरोना चाचणी अहवाल तपासावेत, अशी विमानतळ प्राधिकरणाला विनंती करण्यात आली आहे. तर, रेल्वे मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना ९६ तास आधीचा आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट असणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही राज्यातील १० जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, तिरुवनंतपूरम, कोझिकोड, कोल्लाम आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळMaharashtraमहाराष्ट्र