शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

युतीचे घोडे अडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 05:15 IST

मुंबईत भाजपा-शिवसेनेने एकत्र यावे, अशी भावना भाजपाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली असली, तरी शिवसेनेने मात्र, ताठर भूमिका कायम ठेवत भाजपाला लक्ष्य केले

मुंबई : मुंबईत भाजपा-शिवसेनेने एकत्र यावे, अशी भावना भाजपाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली असली, तरी शिवसेनेने मात्र, ताठर भूमिका कायम ठेवत भाजपाला लक्ष्य केले आहे. ‘भाजपापेक्षा काँग्रेस परवडली’ असे मत व्यक्त करीत काँग्रेसशी युतीचा पर्याय खुला असल्याचे संकेत शिवसेनेने दिले. त्यामुळे युतीचे घोडे अडलेलेच आहे. मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी दिल्लीला जात असून, तेथे ते श्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि भाजपा-शिवसेनेचे मंत्री हे मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मंगळवारी एकत्र येण्याची शक्यता होती, पण उद्या बैठकच नसल्याचे सांगण्यात आले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापाठोपाठ सार्वजनिक बाांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा भाजपा-शिवसेना एकत्र येतील, अशी आशा व्यक्त केली. कोणतीही अभद्र युती होणार नाही, असे सांगत, त्यांनी भाजपा सत्तास्थापनेसाठी काँग्रेस वा राष्ट्रवादीची मदत घेणार नाही, असे स्पष्ट केले. शिवसेनेकडूनही अभद्र युतीची अपेक्षा नसल्याचे मतही व्यक्त केले. मात्र, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबईत महापौर भाजपाचाच असेल, दुसऱ्या कुणाचाही नसेल, असे सांगत शिवसेनेला आव्हान दिले. (विशेष प्रतिनिधी)>मुख्यमंत्र्यांच्या विधानाची शिवसेनेकडून खिल्ली‘भाजपा मुंबईत काँग्रेससोबत जाणार नाही’ या मुख्यमंत्र्यांच्या विधानाची शिवसेनेने मुखपत्रातून खिल्ली उडविली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची काँग्रेस केली आहे त्याचे काय? त्यामुळे काँग्रेस परवडली, पण भाजपाची सध्या झालेली काँग्रेस ही महाराष्ट्राला आणि देशाला कुठे घेऊन जाणार, हा प्रश्नच असल्याचे शिवसेनने म्हटले आहे. फडणवीस सरकार अद्याप नोटीस पीरियडवर असल्याचे खा. संजय राऊत हेही म्हणाले.>मनसे शिवसेनेसोबत!मुंबईत मनसेची भूमिका मराठी माणसाच्या हिताचीच असेल. अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. त्यांच्या विधानातून मनसेचा पाठिंबा शिवसेनेला राहील, असे संकेत मिळाले. राजकारणात कोणीही कुणाचा कायम मित्र वा शत्रू नसतो, असे उद्गारही त्यांनी काढले. >सेना स्वत:हून बाहेर पडणार नाही : राणेशिवसेना विरोधकांबरोबर असल्याशिवाय फडणवीस सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणे शक्य नाही. त्यामुळे काय ते शिवसेनेने ठरवावे. धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली. >महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुखांचे स्मारकशिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आज महापालिकेच्या मावळत्या महासभेत मंजूर करण्यात आला़ सत्तास्थापनेचा निर्णय अधांतरी असल्याने शिवसेनेने हा प्रस्ताव तातडीने मंजूर केला़ त्यामुळे महापौरांचे नवीन निवासस्थान भायखळ्यातील राणीच्या बागेत हलविण्यात येण्याची शक्यता आहे़>असे असेल महापौरांचे नवीन निवासस्थान भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील नवीन बंगला सहा हजार चौरस फुटांचा आहे़ गेल्या दीड वर्षांपासून हा बंगला रिकामा असून, नुकतीच त्याची डागडुजी करण्यात आली आहे़ त्यामुळे हा बंगला महापौर निवासस्थानासाठी देण्याचा विचार सुरू आहे़ मात्र, याबाबत अद्याप प्रस्ताव आलेला नाही़