शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

अक्कू यादव हत्याकांडातील सर्व आरोपी निदरेष

By admin | Updated: November 11, 2014 01:31 IST

अक्कू यादव हत्याकांड खटल्यातील सर्व 18 आरोपींची सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटका केली.

नागपूर : दहा वर्षापूर्वी थेट न्यायालयाच्या कक्षात घडलेल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित कुख्यात गुंड अक्कू यादव हत्याकांड खटल्यातील सर्व 18 आरोपींची सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटका केली. 
सरकार पक्षानुसार 13 ऑगस्ट 2क्क्4 रोजी दुपारी 2.3क् वाजण्याच्या सुमारास जिल्हा न्यायालय आवारातील ऐतिहासिक दगडी इमारतीमध्ये प्रथम श्रेणी न्यायदंडाधिका:यांच्या न्यायालय क्रमांक 7 मध्ये भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव (32) या कुख्यात गुंडाचा संतप्त जमावाने डोळ्यात मिरची पावडर टाकून, चाकू, भाल्याचे पाते, गुप्ती आणि काचेने भोसकून व दगडाने ठेचून निर्घृण खून केला होता. तसेच खून केल्यानंतर जमावाने अक्कूचे घरही जाळून टाकले होते. 
या खटल्यात एकूण 21 आरोपी होते. त्यापैकी तीन आरोपींचे खटला सुरू असताना निधन झाले. एकनाथ दुर्योधन चव्हाण (42), सुमेध सुरेश करवाडे (35), दिलीप महादेव शेंडे (42), पंकज सुधाकर भगत (36), सविता जितेंद्र वंजारी (36), भागिरथा हरिचंद्र अडकिणो (6क्), लीलाबाई रघुनाथ सांगोळे (55), नितेश सीताराम मेश्रम (31), मनीष शंकरराव लाबडे (33), अॅड. विलास श्रीराम भांडे (44), ईश्वर हरिचंद्र अडकिणो (4क्), पिंकी अजय शंभरकर (33), नीलेश सुखदेव हुमणो (32), रितेश सुखदेव हुमणो (35), राजेश चंद्रभान घोंगडे (4क्), उषा मधुकर नारायणो (36), विजय मयूर शिंदे (35) आणि राजेश दत्तू उरकुडे, अशी निदरेष सुटका झालेल्यांची नावे आहेत. तर अजय सुदाम मोहोड, अंजना किसन बोरकर आणि देवांगना सुखदेव हुमणो, अशी निधन झालेल्या आरोपींची नावे आहेत. (प्रतिनिधी)
 
च्अक्कू याच्याविरुद्ध बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणी वसुली आदी 26 गंभीर गुन्हे पोलिसांत दाखल होते. बलात्कार आणि छेडछाडीची अनेक प्रकरणो त्याच्या दहशतीमुळे पोलिसांर्पयत पोहोचतही नव्हती. तडीपार असतानाही तो कायदा मोडून मोहल्ल्यात यायचा आणि गुंडागिरी करायचा. तक्रारीनंतरही पोलीस त्याला अटक करीत नव्हते. 
 
च्अॅड. विलास भांडे यांनी हिंमत करून अक्कूविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली होती. परंतु पोलीस गुन्हा दाखल करीत नव्हते. मात्र,अॅड. भांडे यांनी पत्रपरिषद घेतल्यानंतर जाग आलेल्या पोलिसांनी अक्कूला अटक केली. दुस:या दिवशी त्याला न्यायालयात हजर केले. परंतु त्याचा साथीदार बिपीन बालाघाटी हा अक्कूला जेवणाच्या डब्यात चाकू देताना पकडला गेल्याने न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली़त्यानंतर पुन्हा त्याला 1क् ऑगस्ट रोजी न्यायालयात आणण्यात आले. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली होती. याच दिवशी त्याचा खून करण्यासाठी जमाव आला होता. परंतु तत्कालीन पोलीस उपायुक्त यशस्वी यादव यांच्यामुळे घटना टळली होती. मात्र, 13 ऑगस्ट 2क्क्4 रोजी पुरुष व महिलांच्या संतप्त जमावाने न्यायालय आवारातच अक्कूची निर्घृण हत्या केली़ या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.