शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

अलिबाग गोळीबार सराव दुर्घटनेची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 04:38 IST

अलिबाग येथे गोळीबारचा सराव करताना गोळी लागून जखमी झालेल्या तिघा महिलांसह चौघा पोलिसांची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे. एका महिला पोलिसासह दोघांवर मंगळवारी शस्त्रक्रिया करुन शरीरातील छर्रे काढण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेची गंभीर दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून...

- जमीर काझी मुंबई : अलिबाग येथे गोळीबारचा सराव करताना गोळी लागून जखमी झालेल्या तिघा महिलांसह चौघा पोलिसांची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे. एका महिला पोलिसासह दोघांवर मंगळवारी शस्त्रक्रिया करुन शरीरातील छर्रे काढण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेची गंभीर दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून शस्त्र हाताळणी उजळणीविना परस्पर गोळीबार सरावासाठी परस्परपाठविल्या प्रकरणाची सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर संबंधित दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी स्पष्ट केले.आलिबाग येथील पुरहूरपाडा येथे गोळीबाराचा सराव करीत असताना सोमवारी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल सर्वश्री स्वप्नाली आमटे(२३, रा. घाटकोपर) व रवींद्र मदने (४४, रा. खांदा कॉलनी, पनवेल), नीलम थोरवे (वय २५, रा. कर्जत), सुरेखा बावधने (२३, रा. नायगाव, दादर) गोळी लागून गंभीर जखमी झाले. शस्त्र हाताळणी उजळणी न घेता त्यांना गोळीबार करण्यासाठी पाठविण्यात आले होते.‘लोकमत’मध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती.स्वप्नाली आमटे ही ‘७.६२ एसएलआर’ रायफलमधून फायरिंग करताना झालेल्या चुकीमुळे गोळी उडून तिच्यासह बाजूचे तिघे पोलीसही जखमी झाल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.या सर्वांवर नवी मुंबईतील पनवेल येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.गेल्या ३० जानेवारी ते ३१ मार्चपर्यत मुंबई पोलीस दलातील ४५ वर्षांखालील सर्व अंमलदारांना शस्त्र हाताळणी उजळणी व गोळीबारसराव व्हावा, यासाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजिले आहे. सर्वांना टप्प्याटप्प्याने ते पूर्ण करावयाचे असून त्यामध्ये पहिल्या दिवशी पोलिसांना शस्त्र हाताळणीबाबत उजळणी द्यावी, त्यानंतर दुसºयादिवशी त्यांना प्रत्यक्ष गोळीबाराच्या सरावासाठी पाठवावे, असे वरिष्ठांचे आदेश आहेत. मात्र सोमवारी नायगाव मुख्यालयातील निरीक्षक खंदारे यांनी त्यांना शस्त्र हाताळणी प्रशिक्षणााशिवाय थेट गोळीबार सरावासाठी पाठविले होते.पोलिसांमध्ये तीव्र नाराजीघाटकोपर मुख्यालयातसरावासाठी मैदान असताना काहीजणांनाआलिबागला पाठविण्यात येत असल्याबाबत पोलिसांमध्ये नाराजीआहे. कारण पोलिसांना पहाटे साडेपाच वाजता चार मुख्यालयापैकी एकाठिकाणी हजर रहावे लागत असल्याने भल्या पहाटे ते घराबाहेर पडतात.त्यानंतर पावणे सहाच्या सुमारास रायफल व काडतुसे घेवून पोलीसव्हॅनमधून आलिबागला पाठविले जाते. सुमारे अडीच तासांच्या खडतरप्रवासानंतर भर उन्हात त्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्याठिकाणी पुरेसेस्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याचीही सुविधा उपलब्ध नाही.शिस्तीमुळे याबाबत तक्रार करु शकत नसल्याने त्यांना मारुन मुटकूनसराव करावा लागतो. ‘एलए’च्या अप्पर आयुक्त अस्वती दोरजेयांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी घाटकोपर येथे फायरिंगबाबतपरिसरातील नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने आलिबागला पाठविलेजाते. प्रवास व आलिबाग येथील गैरसुविधेबाबत आपल्याकडे कोणतीहीतक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले. सविस्तर अहवाल मागविलाही घटना गंभीर असून याबाबत सशस्त्र विभागाच्या (एलए) अप्पर आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. त्यानंतर दुर्घटनेला जबाबदार असणाºयांवर योग्य ती कारवाई केली जाईल.- अर्चना त्यागी,सहआयुक्त, प्रशासन

तिघीही महिला खेळाडूदुर्घटनेत जखमी झालेल्या तिन्ही महिला पोलीस या खेळाडू असून नायगाव मुख्यालयात आहेत. आलिबागला पाठविण्यासाठी पुरेसे पोलीस न आल्याने तेथील निरीक्षक खंदारे यांनी त्यांना शस्त्र हाताळणी उजळणीविना थेट गोळीबार सरावासाठी पाठववले. प्राथमिक माहितीनसताना त्यांना पाठवण्यात आले. वरिष्ठ अधिकारी याबाबत काय कारवाई  करतात, याकडे पोलीसाच्ं ा े लक्ष आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र