शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

अलिबाग समुद्र पर्यटक बुडीत दुर्घटना; दुसरा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 09:44 IST

अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे.

ठळक मुद्देअलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे.ऋषभ सिव्हा (24) या तरूणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी ७.३० वाजता सापडला.

- जयंत धुळप

अलिबाग, दि. 17- अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे. ऋषभ सिव्हा (24) या तरूणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी ७.३० वाजता सापडला. तब्बल २९ तासांनंतर नैसर्गिक भरतीत अलिबाग जवळच्याच नागाव समुद्र किनारी हा मृतदेह सापडला आहे. अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली आहे. अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाऱ्याकडे येत असताना दोन जण बुडाल्याची घटना घडली होती. दरम्यान सौरभ खान या पर्यटकाचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३० वाजता नैसर्गिक भरतीच्या वेळीच  तुषार शासकीय विश्रामगृहाजवळ अलिबाग समुद्र किनारी सापडला होता. पण त्या तरूणाचं सौरभ खान असं नाव नसून सोहराब खान असं नाव असल्याचं त्याच्या नातेवाईक येथे आल्यावर त्यांच्याकडून समजल्याचे वराडे यांनी सांगीतलं.

आणखी वाचा

सौरभचा मृतदेह सापडला

अवघ्या १५ मिनिटांत दोघांच्या आत्महत्या

सोहराब खान आणि ऋषभ सिव्हा या दोघा तरुण पर्यटकांचे फोटो आम्हाला तपासादरम्यान त्यांच्याच मोबाईलमधून उपलब्ध झाले. मंगळवारी दुपारी २ वाजता कुलाबा किल्ल्यात जाण्यापूर्वी त्यांनी ते अलिबाग समुद्र किनारीच काढले आहेत. अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील स्मृती आपल्या जवळ राहाव्या या हेतूने काढलेले हे त्यांचे फोटो, काही तासानंतर होणाऱ्या त्यांच्या मृत्यूअंती पोलिसांना मृतदेहाची आेळख पटवण्यासाठी कामी येतील असे त्यांच्याही आणि पोलिसांच्याही मनात नव्हते. परंतु नियतीला तेच मंजूर होते. मी आणि माझी संपूर्ण टीम मंगळवारी घडलेल्या या दूर्दैवी घटनेपासून अत्यंत विषण्ण मनस्थितीत होतो. नातेवाईकांची मनस्थिती पाहील्यावर आम्हालाही दुःख अनावर झाले. अशी दुर्दैवी परिस्थिती कुणाच्याही वाट्याला येवू नये. ऐन उमेदीतील आपली मुले गमावणे यापेक्षा अतिव दूखः आई-वडिलांना दूसरे कोणतेही असू शकत नाही. तरुणाईने कुणीतरी काहीतरी सांगतय ते आपल्याच भल्याचे आहे, याचा विचार करणे अत्यावश्यक आहे, अशी अत्यंत हळवी भावना या साऱ्या प्रसंगांती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी व्यक्त केली आहे.