शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग समुद्र पर्यटक बुडीत दुर्घटना; दुसरा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 09:44 IST

अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे.

ठळक मुद्देअलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे.ऋषभ सिव्हा (24) या तरूणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी ७.३० वाजता सापडला.

- जयंत धुळप

अलिबाग, दि. 17- अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे. ऋषभ सिव्हा (24) या तरूणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी ७.३० वाजता सापडला. तब्बल २९ तासांनंतर नैसर्गिक भरतीत अलिबाग जवळच्याच नागाव समुद्र किनारी हा मृतदेह सापडला आहे. अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली आहे. अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाऱ्याकडे येत असताना दोन जण बुडाल्याची घटना घडली होती. दरम्यान सौरभ खान या पर्यटकाचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३० वाजता नैसर्गिक भरतीच्या वेळीच  तुषार शासकीय विश्रामगृहाजवळ अलिबाग समुद्र किनारी सापडला होता. पण त्या तरूणाचं सौरभ खान असं नाव नसून सोहराब खान असं नाव असल्याचं त्याच्या नातेवाईक येथे आल्यावर त्यांच्याकडून समजल्याचे वराडे यांनी सांगीतलं.

आणखी वाचा

सौरभचा मृतदेह सापडला

अवघ्या १५ मिनिटांत दोघांच्या आत्महत्या

सोहराब खान आणि ऋषभ सिव्हा या दोघा तरुण पर्यटकांचे फोटो आम्हाला तपासादरम्यान त्यांच्याच मोबाईलमधून उपलब्ध झाले. मंगळवारी दुपारी २ वाजता कुलाबा किल्ल्यात जाण्यापूर्वी त्यांनी ते अलिबाग समुद्र किनारीच काढले आहेत. अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील स्मृती आपल्या जवळ राहाव्या या हेतूने काढलेले हे त्यांचे फोटो, काही तासानंतर होणाऱ्या त्यांच्या मृत्यूअंती पोलिसांना मृतदेहाची आेळख पटवण्यासाठी कामी येतील असे त्यांच्याही आणि पोलिसांच्याही मनात नव्हते. परंतु नियतीला तेच मंजूर होते. मी आणि माझी संपूर्ण टीम मंगळवारी घडलेल्या या दूर्दैवी घटनेपासून अत्यंत विषण्ण मनस्थितीत होतो. नातेवाईकांची मनस्थिती पाहील्यावर आम्हालाही दुःख अनावर झाले. अशी दुर्दैवी परिस्थिती कुणाच्याही वाट्याला येवू नये. ऐन उमेदीतील आपली मुले गमावणे यापेक्षा अतिव दूखः आई-वडिलांना दूसरे कोणतेही असू शकत नाही. तरुणाईने कुणीतरी काहीतरी सांगतय ते आपल्याच भल्याचे आहे, याचा विचार करणे अत्यावश्यक आहे, अशी अत्यंत हळवी भावना या साऱ्या प्रसंगांती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी व्यक्त केली आहे.