शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अलिबाग समुद्र पर्यटक बुडीत दुर्घटना; दुसरा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 09:44 IST

अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे.

ठळक मुद्देअलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे.ऋषभ सिव्हा (24) या तरूणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी ७.३० वाजता सापडला.

- जयंत धुळप

अलिबाग, दि. 17- अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे. ऋषभ सिव्हा (24) या तरूणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी ७.३० वाजता सापडला. तब्बल २९ तासांनंतर नैसर्गिक भरतीत अलिबाग जवळच्याच नागाव समुद्र किनारी हा मृतदेह सापडला आहे. अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली आहे. अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाऱ्याकडे येत असताना दोन जण बुडाल्याची घटना घडली होती. दरम्यान सौरभ खान या पर्यटकाचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३० वाजता नैसर्गिक भरतीच्या वेळीच  तुषार शासकीय विश्रामगृहाजवळ अलिबाग समुद्र किनारी सापडला होता. पण त्या तरूणाचं सौरभ खान असं नाव नसून सोहराब खान असं नाव असल्याचं त्याच्या नातेवाईक येथे आल्यावर त्यांच्याकडून समजल्याचे वराडे यांनी सांगीतलं.

आणखी वाचा

सौरभचा मृतदेह सापडला

अवघ्या १५ मिनिटांत दोघांच्या आत्महत्या

सोहराब खान आणि ऋषभ सिव्हा या दोघा तरुण पर्यटकांचे फोटो आम्हाला तपासादरम्यान त्यांच्याच मोबाईलमधून उपलब्ध झाले. मंगळवारी दुपारी २ वाजता कुलाबा किल्ल्यात जाण्यापूर्वी त्यांनी ते अलिबाग समुद्र किनारीच काढले आहेत. अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील स्मृती आपल्या जवळ राहाव्या या हेतूने काढलेले हे त्यांचे फोटो, काही तासानंतर होणाऱ्या त्यांच्या मृत्यूअंती पोलिसांना मृतदेहाची आेळख पटवण्यासाठी कामी येतील असे त्यांच्याही आणि पोलिसांच्याही मनात नव्हते. परंतु नियतीला तेच मंजूर होते. मी आणि माझी संपूर्ण टीम मंगळवारी घडलेल्या या दूर्दैवी घटनेपासून अत्यंत विषण्ण मनस्थितीत होतो. नातेवाईकांची मनस्थिती पाहील्यावर आम्हालाही दुःख अनावर झाले. अशी दुर्दैवी परिस्थिती कुणाच्याही वाट्याला येवू नये. ऐन उमेदीतील आपली मुले गमावणे यापेक्षा अतिव दूखः आई-वडिलांना दूसरे कोणतेही असू शकत नाही. तरुणाईने कुणीतरी काहीतरी सांगतय ते आपल्याच भल्याचे आहे, याचा विचार करणे अत्यावश्यक आहे, अशी अत्यंत हळवी भावना या साऱ्या प्रसंगांती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी व्यक्त केली आहे.