शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अलंकापुरी भक्तिरसात चिंब..!

By admin | Updated: June 18, 2017 00:25 IST

श्रीविठ्ठल भेटीच्या ओढीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८७व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्याने शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजता श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवले.

भानुदास पऱ्हाड । लोकमत न्यूज नेटवर्कआळंदी : ‘‘अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक!!जाईन गे माये तया पंढरपुरा!भेटेन माहेर आपुलिया!!’’श्रीविठ्ठल भेटीच्या ओढीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८७व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्याने शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजता श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवले. देहभान विसरून ‘ज्ञानोबा-माउली-तुकारामां’चा जयघोष करीत लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले. पंढरीकडे जाण्यासाठी लाखो महिला-पुरुष वारकरी दाखल झाल्याने ज्ञानियांच्या अलंकापुरीला भक्तिसागर लोटला होता. प्रस्थान सोहळ्यास पहाटे ४ला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर ‘श्रीं’ना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दूधआरती करण्यात आली. त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे भाविकांच्या पूजा व दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. दुपारी १२ला ‘श्रीं’ना महानैवेद्य देऊन प्रस्थान सोहळ्याच्या तयारी सुरू झाली. प्रथम मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आले. त्यानंतर माउलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व हैबतबाबा पालखी सोहळा यांच्यातर्फे ‘श्रीं’ची आरती केल्यानंतर मंडपात मानकऱ्यांना मान देऊन सजवलेल्या पालखीत माउलींच्या पादुकांना विराजमान करण्यात आले. ग्रामस्थ, मानकऱ्यांच्या खांद्यावरून संजीवन समाधी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीने महाद्वारातून प्रस्थान ठेवले.तत्पूर्वी, वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या निनादात ‘ज्ञानोबा-तुकारामां’चा जयघोष करत फेर, फुगड्यांनी मंदिर परिसर दुमदुमून सोडला होता. वारकऱ्यांच्या उत्साहाला आनंदाची भरती आली होती. भगवी पताका खांद्यावर घेतलेले पुरुष वारकरी, तुळशीवृंदावन डोईवर घेऊन विठूनामाच्या गजरात तल्लीन झालेल्या महिला आणि तरुण वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळ्यात लक्ष वेधून घेतले. हा वैभवी सोहळा मंडप इमारतीत मुक्कामासाठी विसावला.टाळ-मृदुंगाचा निनाद अन् ‘ज्ञानोबा तुकोबां’चा जयघोष आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्य महाद्वारातून मानाच्या ४७ दिंड्याना मंदिरात प्रवेश दिल्यानंतर टाळ-मृदुंगाचा निनाद व ‘ज्ञानोबा तुकोबां’चा जयघोष अंगावर शहारे उमटवीत होता. फेर, फुगडी, मनोऱ्यामधून मनसोक्त बेभान होऊन वारकरी नाचत होते. माउलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षकमाउलींच्या १८७व्या पायीवारी प्रस्थानप्रसंगी पवमान अभिषेक, वेदघोष, समाधीवर माउलींच्या मुखवट्याला दूध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माउलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. या विधीवत पूजासमयी माउलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक दिसत होते.दृष्टिक्षेपात- घंटानादाने पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ. - वैष्णवांचा अलोट भक्तिसागर.- पोलिसांचा चोख बंदोबस्त. - इंद्रायणी काठावर रंगला भक्तांचा आनंदमेळा.