शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे नाही हे विधान परिषद निवडणुकीत कळेल’, अजितदादांचं फडणवीसांना थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:04 IST

Maharashtra Vidhan Parishad Election : राज्यसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कौशल्याचं कौतुक झालं होतं. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आहे.

मुंबई - राज्यसभा निवडणुकीतील सहावी जागा भाजपाने शिताफीने जिंकल्याने राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. त्यामुळे अगदी चार-पाच दिवसांवर आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत या अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कौशल्याचं कौतुक झालं होतं. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आहे. कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे नाही हे विधान परिषद निवडणुकीत कळेल, असा थेट इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.

विधान परिषद निवडणुकीतील रणनीतीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल काठावर लागला आहे. पण अनुभवातून माणूस शिकतो. एखादी निवडणूक लढत असताना ज्यांच्या बाजूने निकाल लागतो त्यांच्याबाजूने कौशल्य असं म्हटलं जातं,  तर जे पराभूत झाले ते कमी पडले असं म्हणतात. राज्यसभा निवडणुकीनंतरही तसंच समजलं गेलं. मात्र आता आता या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे कौशल्य नाही हे जनतेला कळेल, अशा शब्दात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्या राज्यात असलेल्या समिकरणांनुसार दहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत भाजपाचे चार, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदान निवडून येऊ शकतात. तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरस आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा अपक्ष आणि इतरांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, अशा परिस्थितीत एक एक मत निर्णायक ठरेल. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस