शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Ajit Pawar: "आता मी अमृता वहिनींनाच सांगणार आहे बघा जरा...", अजित पवार यांचा फडणवीसांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 15:59 IST

राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज हिवाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवरुन सरकारला धारेवर धरलं.

नागपूर-

राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज हिवाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवरुन सरकारला धारेवर धरलं. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे अनेक महत्वाची कामं रखडून पडलेली असल्याचं सरकारला निदर्शनास आणून देताना सध्याच्या मंत्र्यांकडून तातडीनं निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप केला. अजित पवार यांनी यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याच्या मुद्द्यावरही लक्ष वेधलं. यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 

मोदींबाबत आक्षेपार्ह विधान, CM शिंदे तातडीनं उठले अन् झापलं; मिटकरींनी व्यक्त केली दिलगिरी

"आता सरकार येऊन सहा महिने लोटले तरी अनेक खात्यांना मंत्री यांना मिळेनात. अनेक कामं रखडली आहेत. आता कुणी कितीही गप्पा केल्या तरी भाजपामध्ये देवेंद्र फडणवीसच सर्वात ताकदवान नेते आहेत. कोणत्याही मंत्र्याला काही काम सांगितलं की फडणवीसांना विचारुन सांगतो असं उत्तर मिळतं. सध्या सरकारची अशी अवस्था झाली आहे की मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही अशी नामुष्की यांच्यावर ओढावली आहे. सरकारला एक महिला मंत्री नेमता येत नाही हा तर महिलांचा अपमान आहे. मी आता तर अमृता वहिनींनाच फोन करुन सांगणार आहे की यांच्याकडे बघा जरा", असं अजित पवार यांनी म्हटलं आणि सभागृहात हशा पिकला. काहीतरी करा रात्रीच्या रात्री दिल्लीला फोन लावा आणि उध्याच्या उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करा, असाही चिमटा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला काढला. 

...तर त्यांचा मीच करेक्ट कार्यक्रम करेनअजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना यावेळी बारामती विधानसभा मतदार संघात येऊन केल्या जाणाऱ्या विधानांवरुनही लक्ष्य केलं. "बारामतीत येऊन काहीजण करेक्ट कार्यक्रम करण्याच्या वल्गना करतात. पण मी एक सांगतो जर मी मनात आणलं तर जे वल्गना करताहेत त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल", असं अजित पवार म्हणाले. 

दोष नसताना तुरुंगात टाकता, मोगलाई आहे का?राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुटका झाल्याच्या मुद्द्यावरुनही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. "दोष नसतानाही तपास संस्थांकडून नेत्यांना तुरुंगात टाकलं जातं. काहीच सिद्ध होत नसताना तुरुंगात जाणं किती योग्य आहे? दोष नसताना तुरुंगांत टाकता ही काय मोगलाई आहे का?", असा सवाल करत अजित पवार यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस